शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फक्त पाच योजनांचे डिमांड भरले

By admin | Updated: July 3, 2015 00:56 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ९० योजना हाती घेतल्या होत्या.

८४ योजनांचे काम पूर्ण : वीज पुरवठ्याअभावी योजना बंदचगोंदिया : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ९० योजना हाती घेतल्या होत्या. यातील ८४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तरिही या योजना निकामी पडून आहेत. वीज नसल्याने या योजना विनकामाच्या ठरत असून यातील फक्त पाच योजनांचे डिमांड भरण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या योजनांना कधी वीज कनेक्शन मिळणार हे सांगणे आतातरी कठिण आहे. दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये ९० योजना हाती घेतल्या होत्या. विशेष म्हणजे आतापर्यंत यातील ८४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. यात गोंदिया तालुक्यातील १५ योजना असून सर्व योजनांचे काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही मात्र या योजना अद्याप वीज कनेक्शनपासून वंचीत आहेत. योजना असलेल्या ग्राम पंचायतींकडून वीज वितरण कंपनीकडे ए-१ फॉर्म भरून दिला जात आहे. मात्र यात विभागाची दिरंगाई म्हणा की ग्राम पंचायतींकडून होत असलेला उशीर की फक्त पाच योजनांचे डिमांड भरण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे मुख्यमंत्री कृषी पंपांसाठी पाहिजे तेव्हा वीज कनेक्शन देण्याची गोष्ट करीत आहेत. त्यांचे हे आश्वासन पूर्ण होत नसल्याचे जिल्ह्यात दिसून येते. त्यात पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीतही होत असलेली दिरंगाई चिंतनीय आहे. जलयुक्त शिवार अभियानावर कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. मात्र तयार करण्यात आलेल्या योजना मात्र फक्त वीज कनेक्शनअभावी उभ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)