शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात केवळ ९ टक्केच पडला पाऊस ! खरीप संकाटात मृग कोरडा

By युवराज गोमास | Updated: June 20, 2025 17:12 IST

अस्मानी संकटाची टांगती तलवार ! : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात १,९५,००० हेक्टरवर विविध पिकांची लागवड अपेक्षित आहे. त्यात १,८५,५०० हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. मात्र, १९ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १७.२ मिमी पाऊस पडला असून, अपेक्षित १८९ मिमीच्या तुलनेत ही केवळ ९.१ टक्के इतकी आहे. तालुकानिहाय पर्जन्यमान पाहता पवनी (३२.८ मिमी) आणि लाखांदूर (२८.९ मिमी) वगळता बहुतांश तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ बोरवेल्सची साधने असलेल्यांची २ टक्के धान पेरणी आटोपली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील कमी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास कृषी क्षेत्रावर अनिष्ट परिणामाची शक्यता आहे. 

तलाव, बोड्यांत पाण्याचा ठणठणाट कायमभंडारा विदर्भातील एक महत्त्वाचा धान उत्पादक जिल्हा असून, तो तळ्यांसाठी आणि सुगंधी तांदळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. खरिपात, मका, सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. परंतु, पाऊस लांबल्याने तलाव, बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.

रिमझिम पावसाने किंचित दिलासाजिल्ह्यात गुरुवारला काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. भरपूर पाऊस पडण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पेरणीसाठी अद्यापही वातावरण निर्मिती नाही.

पावसाअभावी नुकसानपाऊस लांबल्याने पेरणीस विलंब होऊ शकतो. विशेषतः धान पिकासाठी वेळेवर पाऊस आवश्यक असतो; उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येऊ शकते. पेरणीसाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत नसल्याने बियाण्यांची उगवण कमी होण्याची शक्यता असते. काही भागात (पवनी, लाखांदूर) तुलनेने जास्त पाऊस झाला असला तरी बहुतेक तालुक्यांत प्रमाण अत्यल्प आहे.

पीक पद्धतीत बदलाची आवश्यकता

  • हवामान-प्रतिरोधक शेती पद्धती अवलंबणे उपयुक्त ठरेल.
  • धानाऐवजी कमी पाण्यावर 3 येणाऱ्या ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांचा पर्याय विचारात घ्यावा.
  • उशिरा येणाऱ्या पावसाचा अंदाज 3 घेत पीक निवड बदलावी, तसेच लवकर वाढणाऱ्या आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी. पेरणीस विलंब झाल्यास खत व्यवस्थापन, पाणी साठवण आणि आंतरमशागत याकडे विशेष लक्ष द्यावे.

"जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पडून जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा तयार झाल्यानंतरच पेरणी करावी."- पद्माकर गिदमारे, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसfarmingशेतीbhandara-acभंडारा