शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात केवळ ९ टक्केच पडला पाऊस ! खरीप संकाटात मृग कोरडा

By युवराज गोमास | Updated: June 20, 2025 17:12 IST

अस्मानी संकटाची टांगती तलवार ! : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात १,९५,००० हेक्टरवर विविध पिकांची लागवड अपेक्षित आहे. त्यात १,८५,५०० हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. मात्र, १९ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १७.२ मिमी पाऊस पडला असून, अपेक्षित १८९ मिमीच्या तुलनेत ही केवळ ९.१ टक्के इतकी आहे. तालुकानिहाय पर्जन्यमान पाहता पवनी (३२.८ मिमी) आणि लाखांदूर (२८.९ मिमी) वगळता बहुतांश तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ बोरवेल्सची साधने असलेल्यांची २ टक्के धान पेरणी आटोपली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील कमी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास कृषी क्षेत्रावर अनिष्ट परिणामाची शक्यता आहे. 

तलाव, बोड्यांत पाण्याचा ठणठणाट कायमभंडारा विदर्भातील एक महत्त्वाचा धान उत्पादक जिल्हा असून, तो तळ्यांसाठी आणि सुगंधी तांदळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. खरिपात, मका, सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. परंतु, पाऊस लांबल्याने तलाव, बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.

रिमझिम पावसाने किंचित दिलासाजिल्ह्यात गुरुवारला काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. भरपूर पाऊस पडण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पेरणीसाठी अद्यापही वातावरण निर्मिती नाही.

पावसाअभावी नुकसानपाऊस लांबल्याने पेरणीस विलंब होऊ शकतो. विशेषतः धान पिकासाठी वेळेवर पाऊस आवश्यक असतो; उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येऊ शकते. पेरणीसाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत नसल्याने बियाण्यांची उगवण कमी होण्याची शक्यता असते. काही भागात (पवनी, लाखांदूर) तुलनेने जास्त पाऊस झाला असला तरी बहुतेक तालुक्यांत प्रमाण अत्यल्प आहे.

पीक पद्धतीत बदलाची आवश्यकता

  • हवामान-प्रतिरोधक शेती पद्धती अवलंबणे उपयुक्त ठरेल.
  • धानाऐवजी कमी पाण्यावर 3 येणाऱ्या ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांचा पर्याय विचारात घ्यावा.
  • उशिरा येणाऱ्या पावसाचा अंदाज 3 घेत पीक निवड बदलावी, तसेच लवकर वाढणाऱ्या आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी. पेरणीस विलंब झाल्यास खत व्यवस्थापन, पाणी साठवण आणि आंतरमशागत याकडे विशेष लक्ष द्यावे.

"जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पडून जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा तयार झाल्यानंतरच पेरणी करावी."- पद्माकर गिदमारे, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसfarmingशेतीbhandara-acभंडारा