शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तालुक्यात केवळ ५४ टक्के धान लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST

लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पाण्यासह विविध सिंचन सुविधेंतर्गत तालुक्यात एकूण १३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी ...

लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पाण्यासह विविध सिंचन सुविधेंतर्गत तालुक्यात एकूण १३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी करण्यात आली. ही लागवड केवळ ५४ टक्के असल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात कृषी वीज पंप, गोसेखुर्द कालव्याचे पाणी व पावसाच्या पाण्याने सिंचन उपलब्ध झाल्याने तालुक्यातील एकूण १३ हजार ९९५ हेक्‍टर क्षेत्रात धानाची लागवड पूर्ण झाली आहे. मात्र, यंदा खरिपात सुरुवातीपासूनच इटियाडोह धरणांतर्गत नहरांद्वारा सिंचनासाठी पाणी उपलब्ध न करण्यात आल्याने तालुक्यातील जवळपास ४ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी रखडली आहे. तालुक्यातील काही क्षेत्रांत सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने पावसाच्या पाण्याने शेतात सिंचन केले जाते. त्यानुसार तालुक्यातील ४९५ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली नसल्याने तालुक्यातून अर्ध्याहून अधिक क्षेत्रात धानाची लागवड रखडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लाखांदूर तालुक्यात एकूण ५ कृषी मंडळे आहेत. या मंडळांत विरली बु., भागडी, मासळ, बारव्हा व लाखांदूर आदी मंडळांचा समावेश आहे. मात्र, भागडी, विरली बु. व मासळ या तीन मंडळांतील शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाद्वारा सिंचन सुविधा उपलब्ध होत असल्याने अधिकांश शेतकऱ्यांची धान लागवड पूर्ण झाली आहे. या क्षेत्रात गोसीखुर्द धरणाद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध केली जात असल्याने या क्षेत्रातील बहुतांश भागात धान लागवड पूर्ण झाली आहे.

उर्वरित लाखांदूर व बारव्हा क्षेत्रांत पावसाचे पाणी व कृषी वीज पंप सुविधेंतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या काही भागांत धानाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, इटियाडोह बांधअंतर्गत नहरांद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध न करण्यात आल्याने या क्षेत्रातील धान रोवणी रखडली असल्याचा दावादेखील शेतकऱ्यांनी केला आहे. एकंदरीत तालुक्यातील पाच कृषी मंडळांतर्गत दरवर्षी खरिपात एकूण २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रात धानलागवड केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.