शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

६३ प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा

By admin | Updated: December 6, 2015 00:25 IST

ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकेत दिसत आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़

पाणीटंचाई भेडसावणार : गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात किंचित वाढभंडारा : ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकेत दिसत आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २०़६४ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ०.५ टक्क्यानी वाढ झाली आहे.लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ वर्तमान स्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ९़१३, बघेडा २़६४२, बेटेकर बोथली व सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक असल्याची नोंद आहे़ भंडारा जिल्ह्यात एकूण लघू प्रकल्प ३१ आहेत. जूने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्या स्थितीत ३१ लघू प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २५़५७ टक्के आहे़ जुने माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा केवळ २९.९४ टक्के आहे़ जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावनवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार यांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)१२ प्रकल्पात जलसाठा शून्ययावर्षी पावसाच्या दडीमुळे प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा झाला नाही. जो जलसाठा होता.त्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी शेतीसाठी व इतर कामासाठी करण्यात आला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. यामध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पाचा समावेश आहे. १२ प्रकल्पामध्ये बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, हिवरा, आमगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा, कोका गावांचा समावेश आहे.संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनेची गरजयावर्षी प्रकल्प, तलाव, बोड्यामध्ये पाण्याचा अल्प साठा असल्याने येत्या उन्हाळ्यात जिल्हावासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे.