शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

पवनी : महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांशिवाय सुरू झाल्या. शिक्षकांनी शाळेत हजेरी लावून विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जायचे त्यांना ऑफलाइन, ऑनलाइन ...

पवनी : महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांशिवाय सुरू झाल्या. शिक्षकांनी शाळेत हजेरी लावून विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जायचे त्यांना ऑफलाइन, ऑनलाइन जे शक्य असेल ते शिक्षण द्यायचे असे शासनाने धोरण ठरविले. शहरातील मागास भाग आणि राज्यातील ग्रामीण भाग यातील ऑफलाइन, ऑनलाइन पर्यायाचा विचार केल्यास शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरत आहे.

शहरातील मागास भागात राहणारे नागरिक आणि राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणारे नागरिक त्यांच्या पाल्यांना स्मार्टफोन विकत घेण्यास सक्षम नाहीत. ते स्वतःचे स्मार्टफोन पाल्यांना शिक्षणासाठी पूर्णवेळ देत नाहीत. स्मार्टफोन आहे; पण इंटरनेट सुविधा मिळत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जाऊन अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे, या प्रश्नावर शिक्षण विभागाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. ऑफलाइन पर्यायाचा विचार केला तर ३० मिनिटांची तासिका घेऊन पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना एका विषयावर मार्गदर्शन करणारे शिक्षक घरोघरी जाऊन एका-एका विद्यार्थ्यांना किती विषय किती वेळात शिकवून मोकळे होतील, हा संभ्रम कायम आहे.

आरोग्याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शाळा सुरू करणे हाच पर्याय योग्य असल्याचे ग्रामीण भागातील पालकांना वाटत आहे. मागील सत्रात पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी ज्यांनी शाळेची वर्गखोलीदेखील पाहिली नाही ते पूर्णतः कोरेच राहिले. या शैक्षणिक सत्रातील अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. सलग दोन वर्षे जे विद्यार्थी शाळाबाह्य राहतील त्यांची शैक्षणिक नुकसानभरपाई कोण आणि कशी करून देणार? एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी आटापिटा करणाऱ्या शिक्षण विभागाने लक्षावधी विद्यार्थी कोरोना संकटामुळे अप्रत्यक्षरीत्या शाळाबाह्य झाले. त्या सर्वांना पुन्हा नियमित शाळेत बोलावून शिक्षणाचा त्यांचा हक्क प्रदान करण्यासाठी प्रभावी योजना आखावी, अशी मागणी होऊ लागली आहे.