शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

पवनी : महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांशिवाय सुरू झाल्या. शिक्षकांनी शाळेत हजेरी लावून विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जायचे त्यांना ऑफलाइन, ऑनलाइन ...

पवनी : महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांशिवाय सुरू झाल्या. शिक्षकांनी शाळेत हजेरी लावून विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जायचे त्यांना ऑफलाइन, ऑनलाइन जे शक्य असेल ते शिक्षण द्यायचे असे शासनाने धोरण ठरविले. शहरातील मागास भाग आणि राज्यातील ग्रामीण भाग यातील ऑफलाइन, ऑनलाइन पर्यायाचा विचार केल्यास शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरत आहे.

शहरातील मागास भागात राहणारे नागरिक आणि राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणारे नागरिक त्यांच्या पाल्यांना स्मार्टफोन विकत घेण्यास सक्षम नाहीत. ते स्वतःचे स्मार्टफोन पाल्यांना शिक्षणासाठी पूर्णवेळ देत नाहीत. स्मार्टफोन आहे; पण इंटरनेट सुविधा मिळत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जाऊन अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे, या प्रश्नावर शिक्षण विभागाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. ऑफलाइन पर्यायाचा विचार केला तर ३० मिनिटांची तासिका घेऊन पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना एका विषयावर मार्गदर्शन करणारे शिक्षक घरोघरी जाऊन एका-एका विद्यार्थ्यांना किती विषय किती वेळात शिकवून मोकळे होतील, हा संभ्रम कायम आहे.

आरोग्याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शाळा सुरू करणे हाच पर्याय योग्य असल्याचे ग्रामीण भागातील पालकांना वाटत आहे. मागील सत्रात पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी ज्यांनी शाळेची वर्गखोलीदेखील पाहिली नाही ते पूर्णतः कोरेच राहिले. या शैक्षणिक सत्रातील अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. सलग दोन वर्षे जे विद्यार्थी शाळाबाह्य राहतील त्यांची शैक्षणिक नुकसानभरपाई कोण आणि कशी करून देणार? एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी आटापिटा करणाऱ्या शिक्षण विभागाने लक्षावधी विद्यार्थी कोरोना संकटामुळे अप्रत्यक्षरीत्या शाळाबाह्य झाले. त्या सर्वांना पुन्हा नियमित शाळेत बोलावून शिक्षणाचा त्यांचा हक्क प्रदान करण्यासाठी प्रभावी योजना आखावी, अशी मागणी होऊ लागली आहे.