शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सर्वसामान्यांना रडविणार कांदा

By admin | Updated: August 17, 2015 00:30 IST

गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यातील दोन लाख टन कांदा सडला. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागला आहे.

४० ते ५० रुपये किलो कांदा : अवकाळी पावसाचा फटकाभंडारा : गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यातील दोन लाख टन कांदा सडला. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सर्वसामान्यांच्या भोजनाचा अविभाज्य घटक असलेला कांदा यावर्षी वाढीव दराने रडविणार आहे. गत आठवड्यात ३० ते ३२ रुपये किलोच्या घरात असलेला कांदा या आठवड्यात ४० रूपयांपर्यंत वधारला आहे. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासोबतच बाजारात डाळींचे दरही कडाडले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.गतवर्षी लागवड करण्यात आलेला कांदा राज्यात वाया गेला. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात कांद्याचे दर चढले आहेत. भंडाराच्या ठोक बाजारात कांद्याचे दर ३० ते ३२ रुपये होते. चिल्लर बाजारात कांद्याचे दर ४० रुपये किलोच्या घरात राहीले. कांद्याच्या दरात झालेल्या दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.बहुतांश नागरिकांनी उन्हाळ्यात कांद्याचा साठा करून ठेवला. २५ ते ५० किलोपर्यंत १० ते १५ रुपये किलो दरात कांद्याची खरेदी केली. आता हा साठा संपत आल्याने त्यांना ४० रुपये किलोच्या वर दराने कांद्याची खरेदी करावी लागणार आहे. कांद्यांचा भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. (शहर प्रतिनिधी) मिरची अधिक तिखटबाजारात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो तर लाल मिरची ११० रुपये किलो आहे. मिरची तिखट १६० रुपये किलो आहे. याउलट स्थिती साखरेची आहे. साखरेचे दर ३२ रूपयावरून घसरून २५ रूपयापर्र्यंत घसरले आहेत. यामुळे साखरेचा गोडवा आणखी वाढणार आहे. डाळी कडाडल्या..कडधान्य बाजार सर्वाधिक तेजीत आहे. यामध्ये पावसाळ्यात सर्वाधिक खरेदी होणाऱ्या डाळी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्या खरेदी करणेही अशक्य झाले आहे. सर्वाधिक विक्री तूर डाळीची होते. तूर डाळीने १०० चा आकडा पार केला आहे. ७० रूपयांपासून ते ११० रूपयांपर्यंत तूर डाळ विकली जात आहे. उडीद डाळ १०० रुपये किलोच्या घरात आहे. मूग डाळ ९० रुपये तर मूगाचा सोल १०० रूपयांच्या घरात आहे. मसूर डाळ ८० रुपये किलो आहे. हरभरा ६० रुपये, वाटाणा ५० रुपये तर बरबटी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.