शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे रुपयाच्या अनुदानासाठी एक हजाराचा विद्यार्थ्यांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

केशोरी : इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यातील शालेय पोषण आहार प्रत्यक्ष वितरण करण्याच्या प्रणालीला बगल देत ...

केशोरी : इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यातील शालेय पोषण आहार प्रत्यक्ष वितरण करण्याच्या प्रणालीला बगल देत त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी दीडशे रुपयाच्या अनुदान प्राप्तीसाठी पालकांना एक हजार रुपयांचे बँक खाते उघडण्याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

शालेय पोषण आहाराचे वितरण जुन्या पद्धतीने करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणेश काडगाये यांनी तहसीलदार अर्जुनी-मोरगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे प्रत्यक्षरीत्या विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येत होते; परंतु यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी कालावधीमधील पोषण आहाराचे वितरण करण्यासाठी पालकांना विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे पालकांना दीडशे रुपयासाठी एक हजार रुपये खर्च करून नवीन बँक खाते उघडण्याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

बँक खाते उघडण्यासाठी लागणारे एक हजार रुपये वाचविण्यासाठी शासनाने थेट बँक खात्यात पोषण आहाराचे अनुदान जमा न करता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना जुन्याच पद्धतीने शालेय पोषण आहाराचे वितरण करावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणेश काडगाये यांनी पालकांची स्वाक्षरी असलेले निवेदन तहसीलदार अर्जुनी-मोरगाव यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले आहे.

पालक आले अडचणीत

उन्हाळी सुट्यांमधील ३५ दिवसांच्या शालेय पोषण आहाराच्या अनुदानापोटी पहिली ते पाचवीसाठी १५६ रुपये, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २३४ रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. शालेय पोषण आहार योजनेच्या अनुदान प्राप्तीकरिता म्हणजे दीडशे रुपयाच्या अनुदानासाठी एक हजार रुपये भरून नवीन बँक खाते उघडणे पालकांना परवडणारे नाही. दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे पालकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. पोषण आहार अनुदान प्राप्तीसाठी नवीन बँक खाते उघडण्याचा निर्णय घेऊन गरीब पालकांना अडचणीत टाकले आहे.