शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती; विद्यार्थ्यांचा हिरमोड : शिक्षकांची शाळा भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

मोहाडी : सोमवारपासून शाळा तर विद्यार्थ्यांविना सुरू झाल्या आहेत. शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता दहावी निकाल तयार ...

मोहाडी : सोमवारपासून शाळा तर विद्यार्थ्यांविना सुरू झाल्या आहेत. शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता दहावी निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू आहे. त्यामुळे दहावीला अध्यापन करणारे शिक्षक दहा दिवसांपासूनच दररोज शाळेत येत आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती होती, तर विद्यार्थी मात्र ऑनलाईनच दिसले.

शाळांतील प्रवेशोत्सव, शाळेत पडणारे पहिले पाऊल, विद्यार्थ्यांची किलबिल, पुस्तकांचा दरवळणारा सुगंध, मित्रांच्या भेटी-गाठी, आनंददायी उपक्रम, पहिल्या दिवशीच्या अध्यापनानंतर मिळणारे जेवण हे सगळं कोरोनाने यावर्षीही हिरावून घेतले आहे. आजपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. शाळा सुरू झाल्या आहेत; पण त्या विद्यार्थ्यांनी बहरल्या नाहीत. मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता. यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाईनच करून घ्यावी लागेल.

शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ शिक्षकांचेच शाळेत पाय पडले. कोरोना पूर्वी शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जात असे. या दिवशी उत्साहाला उधाण येत होते. पहिल्याच दिवशी मिळणाऱ्या पुस्तकांचा मंद सुगंध वर्गखोल्यांत दरवळत असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्गमित्रांची ताटातूट होत असे. शाळेचा पहिला दिवस कधी उजाडतो याची प्रतीक्षा केली जायची. शाळेचा पहिला दिवस मित्रांच्या भेटी-गाठीने अन् वर्गमित्रांच्या छोट्या मैफिलीने रंगत असे. नवीन मित्र जोडले जात असत. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीयच असायचा. शाळा व्यवस्थापन करणारे मुख्याध्यापक, शिक्षक पहिल्या दिवशी मुलांना गोड जेवण घालायचे. तथापि, शाळेत येण्याची हुरहुर, शाळेत येण्याने होणारा किलबिलाट हे सगळे शाळेतले उत्साहवर्धक वातावरण कोविड-१९ ने दोन वर्षांपासून हिरावून घेतले आहे. मर्यादित वेळेत यंदा निकाल जाहीर करायचे असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता दहावी, बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती गरजेची असल्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या होत्या.