शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

वैनगंगेच्या पाण्यावर तेलाचा तवंग

By admin | Updated: April 28, 2017 00:27 IST

एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेली वैनगंगा नदी आता दिवसेंदिवस जीवघेणी ठरू लागली आहे.

नदीपात्रातील पाणी प्रदूषित : रसायनमिश्रीत पाण्यात स्लो पॉयझन नंदू परसावार भंडारा एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेली वैनगंगा नदी आता दिवसेंदिवस जीवघेणी ठरू लागली आहे. मागील दोन वर्षांपासून नाग नदीच्या पाण्याने दूषित झाल्यानंतर ईकार्निया या वनस्पतीने नदीपात्रात आक्रमण केले. आता कारधाजवळील एका कारखान्यातील रसायनमिश्रीत पाण्यामुळे नदीपात्रावर तेलाचा तवंग दिसत आहे. राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताप्राप्त गोसेखुर्द धरण पूर्ण होऊन या धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या धरणात २४५ मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचे काम सुरू झाले होते. जलस्तर वाढविण्याचे काम सुरू झाल्यामुळे बॅकवॉटरमुळे वैनगंगा नदीपात्रात पाणीच पाणी दिसत होते. मागील दोन वर्षे नदीपात्रात सहा मीटर जलसाठा होता. दरम्यान नागनदीचे प्रदूषित पाणी, भंडारा शहरातील सांडपाणी आणि या दूषित पाण्यामुळे उगवलेल्या ईकार्निया वनस्पतीमुळे नदीपात्र अस्वच्छ झाले. आता धरणातील पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील जलस्तर कमी झाला आहे. शहरालगतच्या कारखान्यातील रसायनमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे नदीतील पाण्यावर तेलाचा जाडसर तरंग दिसू लागला आहे. ईशाऱ्यानंतरही पाणी प्रदूषितच नाग नदीचे प्रदूषित पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येऊ नये, असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी धरण विभागाला दिले होते. अन्यथा गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडून धरणातील साठवून ठेवलेले पाणी सोडण्यात येईल, असा गर्भित ईशारा खा.पटोले यांनी दोन वर्षांपूर्वी दिला होता. मात्र त्यानंतरही धरण विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. परिणामी नदी पात्र प्रदूषितच राहिले. ‘नीरी’च्या अहवालाकडे डोळेझाक नागनदीच्या दूषित पाण्यामुळे गोसेखुर्द धरणातील पाणी आणि पवनी ते भंडारा तालुक्यापर्यंत वैनगंगा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. या पाण्यातील रासायनिक घटकांमध्ये ‘स्लो पायझन’ आहे. परिणामी भंडारावासियांना चर्मविकारासह अन्य आजारांनी ग्रासले आहे. नागपूर येथील ‘नीरी’ या पर्यावरण संस्थेने भंडारा जिल्ह्याच्या भू-गर्भातील ८० टक्के पाणी असून पाणी आणखी प्रदूषित होऊ देऊ नका, असे अहवालात म्हटले होते. पोहणाऱ्यांनीही फिरविली पाठ दररोज सकाळी ५ ते ८ या वेळेत वैनगंगा नदीपात्रात पोहणाऱ्यांची खूप गर्दी असते. काही दिवसांपूर्वी नाग नदीच्या दूषित पाण्याचा जलतरणपटूंना त्रास होता. पाण्याच्या दुर्गंधीमुळे त्यांचे पोहणे बंद झाले होते. आता काही दिवसांपासून पाण्यावर तेलाचा तरंग असल्यामुळे जलतरणपटूंमध्ये कमालिचा असंतोष आहे. पोहण्यासाठी पूर्वीसारखी गर्दी अलिकडे मंदावली असल्याचे मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रात नियमित पोहणारे डॉ. पुनम बावनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.