शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अधिकाऱ्यांनी जाणली ‘ग्रामस्वराज अभियाना’ंची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:45 IST

जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देखुटसावरी गावाला भेट : योजना शाश्वत राहण्याकरिता प्रयत्न करा, दिल्लीतून आले अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली. त्यांनी पदाधिकाºयांशी चर्चा करून योजना शास्वत राहण्याकरिता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे ‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येत आहे.राबविलेल्या कामांची पाहणीकरिता खुटसावरी येथे गुरुवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास दिल्ली येथील सामाजिक न्यायचे अधिकारी डॉ. संजय सिंह यांनी भेट दिली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली. य्ाावेळी सरपंच विजय वासनिक यांनी गावाची लोकसंख्या १,११० असून कुटूंब संख्या २८४ तर घराची संख्या आहे. १४ एप्रिलपासून आजपर्यंत ग्रामस्वराज अभियानांतर्गत आखून दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य दिले जात आहेत. या अभियानात अधिकारी व कर्मचारी हिरिरीने सहभाग घेवून गावात जनजागृती करीत असल्याचे सांगितले.यावेळी डॉ. संजय सिंग यांनी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या व्हिजीट बुकवर गावातील योजनांच्या कामाविषयी समाधानकारक असल्याचे नमूद केले. उपस्थित अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना गावातील प्रत्येक नागरिकांना योजनाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले.यावेळी विस्तार अधिकारी बडगे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. सरिता मालडोंगरे, एस. व्ही. ठमके, ए. एस. कानतोडे, आर. बी. मेश्राम, व्ही. व्ही. कांबळे, के. व्ही. तुमडाव, आशावर्कर सुजाता साखरे, ग्रा.पं. सदस्य प्रियंका टेंभुर्णे, छाया वाहने, शिपाई रुस्तम टेंभुर्णे, विनोद बोरकर आदी उपस्थित होते.