शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कार्यालय एक; अधिकारी दोन

By admin | Updated: February 21, 2015 00:48 IST

जिल्ह्यात विविध कार्यालयांतर्गत अनेक पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेच्या

लेखा परीक्षण कार्यालयातील प्रकार : अनेक प्रकरणे थंडबस्त्यातभंडारा : जिल्ह्यात विविध कार्यालयांतर्गत अनेक पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेच्या लेखा परिक्षण कार्यालयात एकाच पदावर दोन अधिकारी अधिनस्थ असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एकाच खुर्चीसाठी दोन अधिकाऱ्यांच्या दावेदारीमुळे खाजगी शिक्षकांची कार्यालयीन प्रकरणे रखडली आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल शिक्षकांना पडला आहे. याची शिक्षण उपसंचालकांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.माहितीनुसार, येथील साई मंदिर मार्गावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातंर्गत लेखा परिक्षण कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकांची वरिष्ठ निवड श्रेणी प्रकरणे, पदोन्नती, सेवा सातत्य प्रकरणे, वेतन निश्चिती प्रकरणे आदी कार्य केली जातात. लेखाधिकारी कार्यालयातून वेतन निश्चिती पडताळणी झाल्याशिवाय शिक्षकांना वेतनाचा लाभ मिळत नाही. पंरतु यासाठी स्वाक्षरी करणारे दोन अधिकारी असल्याने आणि खुर्चीसाठी भांडणे सुरू असल्याने याचा फटका सरळसरळ शिक्षकांना बसत आहे. तत्कालिन लेखाधिकारी ऐ.जे. धाडसे यांची ३१ मे २०१४ रोजी नागपूर येथे प्रशासकीय बदली करण्यात आली. ३० जुलै २०१४ रोजी त्यांना कार्यमुक्त करण्याचे डीडीचे आदेश मिळाले. त्यांच्या जागेवर प्र.ल. आकुनवार यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान धाडसे हे ३१ जुलै २०१५ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी भंडारा येथे बदली करण्याची विनंती केली. त्यांची मागणी फेटाळण्यात आली. धाडसे यांनी सदर प्रकरम महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपुर येथे दाखल केले.३१ आॅक्टोबर २०१४ रोजी आदेशानुसार त्यांची बदली रद्द करण्यात आली. परंतु त्यांना भंडारा येथे रूजु करून घेण्यात आले नाही. न्यायाधिकारणाच्या आदेश अवमान प्रकरणी त्यांनी पुन्हा अपील केली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी १२ फेब्रुवारी २०१५ ला तत्काळ पूर्ववत पदावर रूजु होण्यासंदर्भात धाडसे यांना आदेश दिले. त्यानुसार धाडसे हे रूजू झाले असले तरी प्र.ल. आकुनवार यांच्या अधिनस्थ असलेले दस्तऐवज हे कपाटात कुलूपबंद असल्याने शिक्षकांची कामे रखडली आहेत. आकुनवार यांनी पदभार न सोडल्यामुळे किंवा धाडसे यांना चार्ज न दिल्याने खुर्चीवर बसलेले साहेब आहेत की भरारी पथकात (दौऱ्यावर) असलेले साहेब आहेत, हे शिक्षकांना कळायला मार्ग नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती कायम असल्याने कार्यालय एक; अधिकारी दोन अशी म्हणण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात आकुनवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी) उपसंचालकांनी दखल घ्यावी४एकाच पदावर दोन अधिकारी दावेदारी सांगत असल्याने खाजगी शाळांमधील शिक्षकांची प्रकरणे रखडली आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी दखल घेऊन खुर्चीचा वाद संपवावा व प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक संघ भंडाराने केली आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर मी कार्यालयात रूजू झालो आहे. कागदपत्रे कपाटात कुलुपबंद असल्याने टेबलवरील प्रकरणे मार्गी लागतील. कुलुपबंद फायलींच्या प्रकरणात मी काहीही करू शकणार नाही. - आनंद धाडसे, लेखाधिकारी.