शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सर्वसाधारण जागांवर ओबीसींना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले हाेते. आता ओबीसी प्रवर्गातील निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून हाेत आहेत. त्यामुळे याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने आता हाेणाऱ्या सर्वसाधारण जागांवरील निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजातीलच उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला प्रयाेग भंडारा जिल्ह्यातही हाेत आहे. जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीत ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. केवळ महिला आरक्षणानंतर काय बदल हाेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे ६ डिसेंबर राेजी भंडारा जिल्हा परिषदेतील १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. उर्वरित सर्व जागांवरील निवडणूक हाेत आहे. निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य निवडणूक आयाेगाने स्थगित केलेल्या जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानुसार कार्यक्रम घाेषित झाला. आता १८ जानेवारी राेजी मतदान हाेत आहे.सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले हाेते. आता ओबीसी प्रवर्गातील निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून हाेत आहेत. त्यामुळे याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला काेणताही राजकीय पक्ष नाराज करण्याच्या तयारीत नाही. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. हा घटक निवडणुकीवर प्रभाव पाडू शकताे. त्यामुळे सर्वच पक्ष ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतरही सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र अशा परिस्थितीत ओबीसी संघटना निवडणुकीत काेणती भूमिका घेतात याकडेही सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

ओबीसी समाजाच्या भूमिकेकडे लक्ष- राजकीय आरक्षण गेल्याने संतप्त असलेला ओबीसी समाज या निवडणुकीत काय भूमिका घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही संघटनांनी आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी भूमिका घेतली हाेती. मात्र, मतदानासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन राजकीय पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच ओबीसी समाजातून उमेदवारी देण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यामुळे नाराज ओबीसी समाज काेणती भूमिका घेताे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर हाेत असलेल्या निवडणुकीत भाजप ओबीसी समाजातीलच व्यक्तींनाच उमेदवारी देणार आहे. ओबीसी समाजावर झालेला अन्याय या माध्यमातून दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.- सुनील मेंढे,खासदार

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल. शक्यताे ओबीसी समाजातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल.- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

काॅंग्रेसचे आधीच ठरलेले उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून उभे राहतील. ओबीसी प्रवर्गासाठी काॅंग्रेसने उमेदवार निवडले हाेते. त्यांचा पुन्हा संधी दिली जाईल. ओबीसींवर हाेणारा अन्याय दूर करण्यासाठी काॅंग्रेस प्रयत्न करीत आहे. - माेहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस

 

टॅग्स :ElectionनिवडणूकOBCअन्य मागासवर्गीय जाती