फिडिंग स्पॉट : मानविनर्मित धबधबे तयार करावेतभंडारा : घरटी बनविण्यासाठी जे साहित्य पक्षी वापरतात, त्याचा अभ्यास केला असता असे निदर्शनास आले की, आता पक्षी नायलॉन- प्लास्टिकचे धागे, बारीक तार आदी साहित्य वापरायला लागले आहेत. याचाच अर्थ त्यांना जे नैसिर्गक साहित्य पाहिजे त्याची कमतरता भासत आहे. आधी सिमेंट असो की इतर साहित्य यासाठी ज्यूटच्या बॅगा वापरल्या जायच्या. आता त्यासाठी सर्रास प्लास्टिकच्या बॅगा वापरण्यात येतात. यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. वाढत असलेली तलावांची संख्या आणि क्षेत्रफळ व शहरात वाढणारे ले-आऊट यामुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी मोठी झाडे अभावानेच मिळतात. शिंपी पक्ष्यांनी तर कुंडीतल्या वडाच्या झाडावर आपले घरटे बांधले आहे. काय करता येईल? शहरातील कॅचमेंट एरिया जेव्हा कमी झाला तेव्हा त्या कॅचमेंट अधिवासात राहणारे पक्षी कुठे गेले असतील, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पक्ष्यांना परत बोलवायचे असेल तर आपण विदेशातील शहरांप्रमाणे वॉटर फॉल (पाण्याचे धबधबे) निर्माण करून मानविनर्मित ओढा निर्माण करायला हवा. ओढाच्या बाजूला आपण पक्षी निरीक्षणासाठी जागा निर्माण करू शकतो, जेणे करून पक्षी निरीक्षकांची संख्या वाढेल. त्यासोबत ते पक्ष्यांना खाद्यसुद्धा पुरवू शकतील. शहरात जेथे शक्य आहे तेथे पक्ष्यांसाठी फिडिंग स्पॉट निर्माण करायला पाहिजे, त्यामुळे पक्ष्यांवर अन्नासाठी पडणारा ताण कमी होईल आणि प्रजोत्पादन सुरू ठेवतील. (प्रतिनिधी)जून-जुलै महिना कठीणजून-जुलै हा काळ पक्ष्यांसाठी खाद्य मिळविण्याच्या दृष्टीने थोडा कठीणच असतो. कारण जमिनीवर पडलेले बी एकतर उगवतात किंवा ते नष्ट पावतात आणि इतर वनस्पती गवतसुद्धा नवीन पालवी घेऊन असतात. दुसरीकडे बियाणे पेरण्याचा हंगाम आहे. पण त्यात असे होत असते की जे द्विदल धान्य आहे. (तूर, डाळी, शेंगदाणे वगैरे) ते उगवताना त्यांचे बियाणे हे जमिनीच्या वर येत असतात. काही पक्षी हे लहान रोपट्यांना इजा न पोहोचिवता त्यातील काही भाग खुडून खातात. परंतु शेतकरी सोयाबीन, ज्वारी, धान इत्यादी बियाण्यांना वाचिवण्यासाठी विषारी द्रव्याचा वापर करतात. त्याचाही फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे हे दोन महीने पक्ष्यांना कठीण जातात.
नायलॉनचा अतिवापर घातक
By admin | Updated: June 26, 2015 00:58 IST