शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेल्वेंची संख्या वाढविण्यात आली असली तरी स्थानकावर ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेल्वेंची संख्या वाढविण्यात आली असली तरी स्थानकावर थांबे मात्र देण्यात आलेले नाही.

भंडारा जिल्ह्यावर रेल्वेचे विशेषत: सुपरफास्ट गाड्यांचे थांबे देण्याबाबत पक्षपात करण्यात आला आहे. गोंदियाला सर्वाधिक रेल्वेचे थांबे देण्यात आले. मात्र, भंडारा रोड व तुमसर थांबे देण्यात मध्य रेल्वे प्रशासन कुचराई करीत असते. यासंबंधाने अनेकदा प्रवाशांनी मागणी केली आहे; मात्र निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज आहे.

बॉक्स

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?

भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असतानाही या ठिकाणी बहुतांश एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्या थांबत नाही. मुंबई ते हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करीत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्थानक असतानाही दुसरीकडे थांबे देण्यात आले आहेत. नागपूरनंतर सरळ गोंदियाला अनेक गाड्यांचे थांबे आहेत. मात्र, जिल्हा मुख्यालय असतानाही महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांचे थांबे का नाहीत याचे उत्तर लोकप्रतिनिधीही द्यायला तयार नाहीत. एकमेकांकडे अंगुली निर्देश केले जात आहे.

कोट

-

कोरोना काळात रेल्वे बंदच होती. हळूहळू रेल्वेचा प्रवास आता सुरू केला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू असल्या तरी बहुतांश अन्य एक्स्प्रेस व सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे नाहीत. अन्य राज्यात जाण्यासाठी आम्हाला दुसऱ्या रेल्वे स्थानकाहून तिकीट आरक्षित करावी लागते. याकडे लोकप्रतिनिधींनी व रेल्वे प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.

- मोतीराम लुचे