शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

रुग्णसंख्येत घट, मृतांची संख्या कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दररोज सरासरी १२०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ ...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दररोज सरासरी १२०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजार व्यक्ती कोरोनाबाधित झाले हाेते तर मृतांचा आकडाही वाढत होता. यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु मे महिना उजाडताच रुग्णांची संख्या घटायला लागली. १ मे रोजी ६८५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. २ मे राेजी ६१५, ३ मे रोजी ५५०, ४ मे रोजी ५७३ आणि बुधवार ५ मे रोजी ५७८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, मृत्यूची संख्या कमी होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. जिल्ह्यात बुधवारी १९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९२४ जणांना कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज सरासरी १० जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आजही तेवढीच आहे.

बुधवारी २८०९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५७८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. भंडारा तालुक्यात २२९, मोहाडी २६, तुमसर १३०, पवनी ५५, लाखनी ४४, साकोली ७५, लाखांदूर १९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ हजार ७०५ व्यक्ती बाधित आढळून आले. १९ जणांच्या मृत्यूमध्ये भंडारा सात, तुमसर सहा, पवनी आणि साकोली प्रत्येकी दोन तर मोहाडी व लाखनीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ५४५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ८२३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात

जिल्ह्यात आतापर्यंत ९२४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ५३९ जणांचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. भंडारा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात २१५ व्यक्तींचा तर बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयात ८३ व्यक्तींचा मृत्यू झाला. ८७ व्यक्ती वाटेत किंवा घरीच मृत्युमुखी पडले आहेत. जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्यांची टक्केवारी ५८.३ आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक गंभीर रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपचारासाठी दाखल होते.

बॉक्स

रिकव्हरी रेट वाढला

एप्रिल महिन्यात ७५ पर्यंत खाली आलेला रिकव्हरी रेट एप्रिल महिन्यात वाढल्याचे दिसत आहे. बुधवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९४ टक्के होते. गत पाच दिवसांपासून बाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.७२ टक्के आहे.