शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

रुग्णसंख्येत घट, मृतांची संख्या कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दररोज सरासरी १२०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ ...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दररोज सरासरी १२०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजार व्यक्ती कोरोनाबाधित झाले हाेते तर मृतांचा आकडाही वाढत होता. यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु मे महिना उजाडताच रुग्णांची संख्या घटायला लागली. १ मे रोजी ६८५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. २ मे राेजी ६१५, ३ मे रोजी ५५०, ४ मे रोजी ५७३ आणि बुधवार ५ मे रोजी ५७८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, मृत्यूची संख्या कमी होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. जिल्ह्यात बुधवारी १९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९२४ जणांना कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज सरासरी १० जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आजही तेवढीच आहे.

बुधवारी २८०९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५७८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. भंडारा तालुक्यात २२९, मोहाडी २६, तुमसर १३०, पवनी ५५, लाखनी ४४, साकोली ७५, लाखांदूर १९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ हजार ७०५ व्यक्ती बाधित आढळून आले. १९ जणांच्या मृत्यूमध्ये भंडारा सात, तुमसर सहा, पवनी आणि साकोली प्रत्येकी दोन तर मोहाडी व लाखनीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ५४५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ८२३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात

जिल्ह्यात आतापर्यंत ९२४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ५३९ जणांचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. भंडारा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात २१५ व्यक्तींचा तर बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयात ८३ व्यक्तींचा मृत्यू झाला. ८७ व्यक्ती वाटेत किंवा घरीच मृत्युमुखी पडले आहेत. जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्यांची टक्केवारी ५८.३ आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक गंभीर रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपचारासाठी दाखल होते.

बॉक्स

रिकव्हरी रेट वाढला

एप्रिल महिन्यात ७५ पर्यंत खाली आलेला रिकव्हरी रेट एप्रिल महिन्यात वाढल्याचे दिसत आहे. बुधवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९४ टक्के होते. गत पाच दिवसांपासून बाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.७२ टक्के आहे.