शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान विक्रीची प्रतीक्षा करावी लागते. अवकाळी पावसाचा उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला फटका बसतो.

ठळक मुद्देदिलासा : मुंबई येथील बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत धान खरेदी केंद्राची संख्या अपुरी असल्याने दरवर्षी धान विकताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. आठ ते दहा दिवस धान खरेदी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर असतात. ही अडचण लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथील बैठकीत घेण्यात आला. यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान विक्रीची प्रतीक्षा करावी लागते. अवकाळी पावसाचा उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने मुंबई येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची बुधवारी बैठक  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी खासदार पटेल यांनी धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रामागे एक केंद्र देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितींना सुद्धा हमी भाव धान खरेदी केंद्राची परवानगी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी ना.भुजबळ यांनी खरेदी विषयी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विभाग मंडळांना सर्व बाबींचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नवीन धान खरेदी केंद्र सुरु करुन धान खरेदी वाढविण्यात यावी, धान उत्पादन जास्त होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्धतेचे नियोजन करावे या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्रणालीचे योग्य व्यवस्थापन करावे अशी सूचनाही करण्यात आली.बैठकीला खासदार प्रफुल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्ता तणपुरे, आमदार राजु कारेमोरे, मोहन चंद्रिकापुरे यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव आणि मार्केटिंग फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना वेळेत चुकारे मिळावे-प्रफुल पटेलशासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. केंद्रावर बारदाना व इतर सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच धानाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वेळेत मिळावे या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना खासदार प्रफुल पटेल यांनी या बैठकीत केली. 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल