शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

-आता समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 15, 2015 00:34 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे.

बियाण्यांची जुळवाजुळव : संकट पाठ सोडायला तयारच नाहीभंडारा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. शेतामध्ये शेणखते पसरविण्याचेही काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे धरणी हिरवा शालू नेसण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून येते. बळीराजा आता बियाण्यांची कशीबशी जुळवाजुळव करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र दमदार पाऊस न कोसळल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी पेरणीकरिता सध्या कोणतीही ‘रिस्क’ न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्याकडील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून असून निसर्गाचा पाऊस लहरी आहे, हे चित्र पुन्हा सध्या तरी दिसत आहे. मात्र या लहरी पावसावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. मागील वर्षीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. दुबार, तिबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून शेतकरी सतर्क आहे. समाधानकारक पावसाची आता शेतकरी वाट बघत आहे. मागील काही महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून घरावरील छते व टिनपत्रे उडविली. वीज पुरवठाही खंडित झाला होता. अशा अनेक संकटांना तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. एप्रिल व मे महिन्यात बळीराजाने लगीनसराईची कामे उरकवून घेतली. मात्र अद्यापही मान्सूनचा पाऊस आलाच नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. यंदाही जादा दराने बियाणे व खताची विक्री, मुदतबाह्य बियाणांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. दुबार, तिबार पेरणीचा फटका बसू नये म्हणून पेरणीकरिता बळीराजा विचारपूर्वक पाऊल टाकत आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाली असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा भार पेलतानाच खरीप हंगामाच्या बियाण्यांची जुळवाजुळव करताना उसणवारी करून कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही. मात्र नापिकी आणि कर्जाने शेतकरी होरपळला असताना पुढील शेतीच्या हंगामाकरिता पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. गेल्या हंगामात निसर्गाने दगा दिला. तरी पुन्हा नव्या जोमाने हिरवे स्वप्न उराशी बाळगून बळीराजा जोमाने शेती कामाकडे वळत आहे. (प्रतिनिधी) आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक संकट बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. मात्र निसर्ग साथ देईल आणि शेती पिकवून कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेच्या बळावर रखरखत्या उन्हात बळीराजा शेतीची मशागत करीत आहे. बियाण्यांची जुळवाजुळव आणि शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. शेती हा एकच पर्याय शेतकऱ्यांसमोर असल्याने शेतीसाठी पैसा जुळवताना शेतक-यांच्या नाकीनऊ येत आहे.