शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

आता ग्रामस्थांना मिळणार सौर चुली

By admin | Updated: January 25, 2016 00:38 IST

जंगलव्याप्त गावात कुऱ्हाड बंदी घोषित करण्यात आल्यानंतर नागरिकांसाठी वन विभागाने अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

नऊ गावांची निवड : वन विभागाची योजनारंजित चिंचखेडे  चुल्हाड (सिहोरा) जंगलव्याप्त गावात कुऱ्हाड बंदी घोषित करण्यात आल्यानंतर नागरिकांसाठी वन विभागाने अभिनव उपक्रम सुरु केला आहे. गावातील नागरिकांना सौर सुधारित चुली व साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. यात सिहोरा परिसरातील नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.सिहोरा परिसरात राखीव व संरक्षीत वनात सहा हजार हेक्टर आर हून अधिक क्षेत्रात वनाची व्याप्ती आहे. येथे वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी वन विभागामार्फत अनेक अभिनव योजना सुरु केल्या आहेत. परिसरातील गावात कुऱ्हाड बंदी करण्यात आल्याने इंधनासाठी गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले आहे. जंगल शेजारी वास्तव्य करणारे गावकरी यांना वनात प्रवेश बंदी करण्यात येत असल्याने त्यांच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न वन विभागामार्फत सुरु आहे. जळावू लाकडांची गरज असल्याने गावकरी जंगलात धाव घेतात. यात अनेकदा मानव-प्राणी संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गावात वास्तव्य करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाना सौर साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या योजनेत मुरली, सोनेगाव, धनेगाव, चुल्हरडोह, दावेझरी, चांदपूर, सोंड्या, टेमनी, सोदेपूर गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक कुटुंबांना सौर दिवे, सौर कुकर व सौर सुधारित चुलीचे वाटप केले जाणार आहे. या गावातील १० हजारहून अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. वन विभागाचे सहाय्यक कार्यालय अंतर्गत अशा आशयाचे प्रस्ताव वरिष्ठ विभागांना सादर करण्यात आले आहे. वन विभागाने वनग्राम योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत गावकऱ्यांना साहित्य विक्री करताना मार्केटिंग उपलब्ध केली जाणार आहे.या योजनेत मुरली, सोनेगाव, चुल्हरडोह, पचारा, धनेगाव, दावेझरी, हरदोली, सिहोरा, सितेपार, वांगी गावाचा यात समावेश करण्यात आला आहे. साहित्य विक्रीत गावकऱ्याची होणारी लुट थांबविण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. गावात असणाऱ्या फळझाडांची सर्वेक्षण व नोंद करण्याचे कामांना गती देण्यात आली आहे. गावात फळ, मोहफुल, डिंग आदींची साठवणूक करण्यात येत आहे. परंतु साहित्य विक्रीला मार्केटिंग सापडत नसल्याने गावकऱ्यांची व्यापारी लुट करीत आहेत. आता हे साहित्य वन ग्राम समिती थेट लिलावात काढणार आहे. यामुळे गावकऱ्यांना थेट राशी प्राप्त होणार आहे. दरम्यान साहित्य विक्रीला मार्केटिंग प्राप्त करून देण्याची जबाबदारी वन विभागाच्या खांद्यावर आहे. यामुळे मुख्य प्रवाहात नागरिकांना आणण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. एरवी जंगल आणि वनाचे संरक्षण व व्याप्तीचे विचार वन विभागात केलेजात असताना नागरिकांना रोजगाराची उब देण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आल्याने निश्चितच वन आणि जंगलांना अच्छे दिन येणार आहेत.