शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आता ग्रामस्थांना मिळणार सौर चुली

By admin | Updated: January 25, 2016 00:38 IST

जंगलव्याप्त गावात कुऱ्हाड बंदी घोषित करण्यात आल्यानंतर नागरिकांसाठी वन विभागाने अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

नऊ गावांची निवड : वन विभागाची योजनारंजित चिंचखेडे  चुल्हाड (सिहोरा) जंगलव्याप्त गावात कुऱ्हाड बंदी घोषित करण्यात आल्यानंतर नागरिकांसाठी वन विभागाने अभिनव उपक्रम सुरु केला आहे. गावातील नागरिकांना सौर सुधारित चुली व साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. यात सिहोरा परिसरातील नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.सिहोरा परिसरात राखीव व संरक्षीत वनात सहा हजार हेक्टर आर हून अधिक क्षेत्रात वनाची व्याप्ती आहे. येथे वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी वन विभागामार्फत अनेक अभिनव योजना सुरु केल्या आहेत. परिसरातील गावात कुऱ्हाड बंदी करण्यात आल्याने इंधनासाठी गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले आहे. जंगल शेजारी वास्तव्य करणारे गावकरी यांना वनात प्रवेश बंदी करण्यात येत असल्याने त्यांच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न वन विभागामार्फत सुरु आहे. जळावू लाकडांची गरज असल्याने गावकरी जंगलात धाव घेतात. यात अनेकदा मानव-प्राणी संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गावात वास्तव्य करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाना सौर साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या योजनेत मुरली, सोनेगाव, धनेगाव, चुल्हरडोह, दावेझरी, चांदपूर, सोंड्या, टेमनी, सोदेपूर गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक कुटुंबांना सौर दिवे, सौर कुकर व सौर सुधारित चुलीचे वाटप केले जाणार आहे. या गावातील १० हजारहून अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. वन विभागाचे सहाय्यक कार्यालय अंतर्गत अशा आशयाचे प्रस्ताव वरिष्ठ विभागांना सादर करण्यात आले आहे. वन विभागाने वनग्राम योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत गावकऱ्यांना साहित्य विक्री करताना मार्केटिंग उपलब्ध केली जाणार आहे.या योजनेत मुरली, सोनेगाव, चुल्हरडोह, पचारा, धनेगाव, दावेझरी, हरदोली, सिहोरा, सितेपार, वांगी गावाचा यात समावेश करण्यात आला आहे. साहित्य विक्रीत गावकऱ्याची होणारी लुट थांबविण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. गावात असणाऱ्या फळझाडांची सर्वेक्षण व नोंद करण्याचे कामांना गती देण्यात आली आहे. गावात फळ, मोहफुल, डिंग आदींची साठवणूक करण्यात येत आहे. परंतु साहित्य विक्रीला मार्केटिंग सापडत नसल्याने गावकऱ्यांची व्यापारी लुट करीत आहेत. आता हे साहित्य वन ग्राम समिती थेट लिलावात काढणार आहे. यामुळे गावकऱ्यांना थेट राशी प्राप्त होणार आहे. दरम्यान साहित्य विक्रीला मार्केटिंग प्राप्त करून देण्याची जबाबदारी वन विभागाच्या खांद्यावर आहे. यामुळे मुख्य प्रवाहात नागरिकांना आणण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. एरवी जंगल आणि वनाचे संरक्षण व व्याप्तीचे विचार वन विभागात केलेजात असताना नागरिकांना रोजगाराची उब देण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आल्याने निश्चितच वन आणि जंगलांना अच्छे दिन येणार आहेत.