शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

आता भंडाऱ्याचे ‘फिरते पोलीस ठाणे’ पॅटर्न राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:25 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम २६ जानेवारी २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देविनिता साहू यांचा उपक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम २६ जानेवारी २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामीण भागातून व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आता हा उपक्रम आता राज्यात राबविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.भंडारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे गावाच्या विकास प्रक्रियेत अडसर ठरणाऱ्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात निर्माण झालेले दिवाणी, महसुली, फौजदारी, जुने भांडणे हे पोलीस व लोकसहभागातून सामंजस्यातून मिटविले जात आहेत. त्यामुळे ‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमामुळे गावातील वादविवाद, भांडणे सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. पोलीस ठाण्यापर्यंत सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, महिला, लहान मुले-मुली जे आपली तक्रार देण्याकरिता जात नव्हते अशा पीडित व्यक्तींना फिरते पोलीस ठाण्यामुळे जवळीक निर्माण झाली आहे.‘भंडारा पोलीस आपके साथ भी... आपके पास भी...’ हे ‘फिरते पोलीस ठाणे’ या संकल्पनेचे घोषवाक्य आहे.सदर फिरते पोलीस ठाणे दर शनिवारला ग्रामीण भागातील जास्त अंतरावर असलेल्या ठिकाणी जावून त्याठिकाणी तंबू टाकून तेथील नागरिकांच्या तक्रारी, समस्यांची नोंद करून त्याचवेळी तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे.फिरते पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, पोलीस मित्र व गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी उपस्थित राहतात. जनमानसात पोलिसांबद्दल असलेली भीती कमी व्हावी, पोलिसांद्वारे विविध योजनेची जनजागृतीबाबत मंच उपलब्ध व्हावा यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सोयीस्कर ठरत आहे.३४ हजार लोकांचा सहभाग२८ जानेवारी २०१७ पासून १६ डिसेंबर २०१७ पर्यंत एकूण १७ पोलीस ठाण्यामध्ये ७४९ फिरते पोलीस ठाणे कॅम्प आयोजित करण्यात आले. सदर कॅम्पमध्ये एकूण ३४ हजार लोकांनी सहभाग घेऊन एकूण १९७ तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारींचा निर्वाळा करून तक्रारकर्त्यांचे समाधान करण्यात येत आहे.पोलीस अधीक्षकांना गौरविले‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन पोलीस अधीक्षक विनिंता साहू यांचा त्यांनी नागपूर येथे गौरव केला. यावेळी आ.डॉ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, आ.रामचंद्र अवसरे, मुख्य सचिव सुमित मलीक, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते.गुन्ह्यात घट झाल्याचा दावाफिरते पोलीस ठाणेमुळे जनतेमध्ये कायद्याबद्दल व स्त्री अत्याचाराबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. दिवाणी स्वरूपाचे छोटेमोठे वाद सामंजस्याने सोडविले जात असल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत सन २०१७ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान घडलेल्या गुन्ह्यांपैकी खूनाच्या १४ घटना, चोरीच्या ७३, फसवणूकीच्या १०, बलात्कार ६ अशा गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.गुन्हे उघडकीस आणण्याचे तसेच मालमत्ता हस्तगत करण्याच्या प्रमाणात पोलिसांना यश आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.