शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आता भंडाऱ्याचे ‘फिरते पोलीस ठाणे’ पॅटर्न राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:25 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम २६ जानेवारी २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देविनिता साहू यांचा उपक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम २६ जानेवारी २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामीण भागातून व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आता हा उपक्रम आता राज्यात राबविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.भंडारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे गावाच्या विकास प्रक्रियेत अडसर ठरणाऱ्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात निर्माण झालेले दिवाणी, महसुली, फौजदारी, जुने भांडणे हे पोलीस व लोकसहभागातून सामंजस्यातून मिटविले जात आहेत. त्यामुळे ‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमामुळे गावातील वादविवाद, भांडणे सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. पोलीस ठाण्यापर्यंत सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, महिला, लहान मुले-मुली जे आपली तक्रार देण्याकरिता जात नव्हते अशा पीडित व्यक्तींना फिरते पोलीस ठाण्यामुळे जवळीक निर्माण झाली आहे.‘भंडारा पोलीस आपके साथ भी... आपके पास भी...’ हे ‘फिरते पोलीस ठाणे’ या संकल्पनेचे घोषवाक्य आहे.सदर फिरते पोलीस ठाणे दर शनिवारला ग्रामीण भागातील जास्त अंतरावर असलेल्या ठिकाणी जावून त्याठिकाणी तंबू टाकून तेथील नागरिकांच्या तक्रारी, समस्यांची नोंद करून त्याचवेळी तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे.फिरते पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, पोलीस मित्र व गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी उपस्थित राहतात. जनमानसात पोलिसांबद्दल असलेली भीती कमी व्हावी, पोलिसांद्वारे विविध योजनेची जनजागृतीबाबत मंच उपलब्ध व्हावा यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सोयीस्कर ठरत आहे.३४ हजार लोकांचा सहभाग२८ जानेवारी २०१७ पासून १६ डिसेंबर २०१७ पर्यंत एकूण १७ पोलीस ठाण्यामध्ये ७४९ फिरते पोलीस ठाणे कॅम्प आयोजित करण्यात आले. सदर कॅम्पमध्ये एकूण ३४ हजार लोकांनी सहभाग घेऊन एकूण १९७ तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारींचा निर्वाळा करून तक्रारकर्त्यांचे समाधान करण्यात येत आहे.पोलीस अधीक्षकांना गौरविले‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन पोलीस अधीक्षक विनिंता साहू यांचा त्यांनी नागपूर येथे गौरव केला. यावेळी आ.डॉ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, आ.रामचंद्र अवसरे, मुख्य सचिव सुमित मलीक, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते.गुन्ह्यात घट झाल्याचा दावाफिरते पोलीस ठाणेमुळे जनतेमध्ये कायद्याबद्दल व स्त्री अत्याचाराबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. दिवाणी स्वरूपाचे छोटेमोठे वाद सामंजस्याने सोडविले जात असल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत सन २०१७ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान घडलेल्या गुन्ह्यांपैकी खूनाच्या १४ घटना, चोरीच्या ७३, फसवणूकीच्या १०, बलात्कार ६ अशा गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.गुन्हे उघडकीस आणण्याचे तसेच मालमत्ता हस्तगत करण्याच्या प्रमाणात पोलिसांना यश आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.