शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

आता सिंचन विहिरींना मिळणार तीन लाख रुपयांचे अनुदान

By admin | Updated: November 22, 2015 00:23 IST

जवाहर विहीर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी

योजनेचे स्वरुप बदलले : जवाहर विहिरींचा अनुशेष भरुन निघणारचंदन मोटघरे लाखनी जवाहर विहीर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुशल कामांतर्गत विहिरी तयार करण्यात आल्या होत्या. जवाहर योजना बंद पडली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरींना शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन सिंचन विहिरीचा उपक्रम राबवित असुन प्रत्येक तालुक्याला नवीन विहीरीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीसाठी अर्ज सादर केले होते त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली. यात सन २०१२-१३, २०१३-१४ मध्ये मंजूर विहिरी एमआयएस नोंद असलेल्या २,८४५ विहिरीपैकी ३१५ रद्द करण्यात आले आहेत. शिल्लक २,५३० विहिरीपैकी २,२४६ सीसी अपलोड, २४१ बोअरकरिता ४३ सीसीकरीता प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यावर पंचायत समितीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. नवीन प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.भंडारा जिल्ह्यात जवाहर विहिरीच्या अनुशेष १,०५६ विहिरीचा आहे. नवीन ७०० विहिरींना मंजुरी दिलेली आहे. अश्या २०१५-१६ मध्ेय १,७५६ सिंचन विहीरींचे बांधकाम मग्रारोहयो माध्यमातून करावयाचे आहेत. जवाहर रोजगार योजनेच्या विहिरीचा अनुशेष तालुकानिहाय याप्रमाणे, भंडारा २४२, लाखांदूर २२, लाखनी ९४, मोहाडी १९४, पवनी १४५, साकोली १३१, तुमसर २२८ याप्रमाणे आहे. नवीन विहीरी तालुका निहाय भंडारा ५०, लाखांदूर २००, लाखनी ११५, मो हाडी ३५, पवनी १००, साकोली २००, तुमसर १०० याप्रमाणे मंजुर करण्यात आलेले आहे. लाखनी तालुक्याला २०९ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आमदारांच्या शिफारशीने जवाहर विहिरीचे वाटप होत असे त्यालाच नवीनतम स्वरुप देण्यात आले आहे. जवाहर विहिरींचे अनुशेष पुर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना विहिर नको, अशा शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे.सिंचन विहिरीचे अनुदान शासनाने पाठवले आहे. ३ लाख रूपयांपर्यंतचे अनुदान नवीन सिंचन विहिरीसाठी दिले जाणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून अडगळीत गेलेली विहिर योजना पुन्हा नव्या स्वरुपात शेतकऱ्यांसमोर आली आहे. सिंचन विहिरीकरिता लाभार्थी निवड ग्रामसभाद्वारे करावयाचे आहे. त्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय तसेच दारिद्रय रेषेखालील असलेल्या कुटूंबाना प्राधान्य देण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०१५ पर्यंत लाभार्थि निश्चित करुन डिसेंबर पासून सिंचन विहिरीचे कामे प्राधान्याने सुरु कराव्यात अशा सुचना आहेत. शासन विहिरीसाठी अनुदान देत असते. विहिरी खोदल्या जातात. पण पाणी लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कल विधन विहिरीकडे आहे. शासनाने अनुदानात वाढ करुन योजना पुर्नजिवित केली आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो यावरच या योजनेचे यशापयश अवलंबून आहे.