शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आता उड्डाणपूल होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:14 IST

लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते.

ठळक मुद्देमहामार्गावरील आठवडी बाजारात बंदोबस्त : लाखनीत अतिक्रमण निर्मूलन मोहीम

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते. आता मुदतीनंतर प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गावरील १०० फुटापर्यंतचे अवैध बांधकाम, पानठेले, लहान दुकाने, दुकानासमोरील टिनाचे शेड हटविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लाखनीत येत्या काही दिवसात उड्डाणपुलाची समस्या मार्गी लागणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अशोका बिल्डकॉम, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व उड्डाणपुलाचे बांधकाम करणारी जेएमसी कंपनी यांच्या संयुक्तवतीने लाखनी शहरातील व्यापाºयांना अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही व्यापाºयांनी आवाहनाला प्रतिसाद देत अतिक्रमण हटविले. परंतु प्रतिसाद न देणाºया व्यापारी व दुकानचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आजपासून आरंभ करण्यात आली आहे. १०० फुटापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू होत असल्यामुळे सर्व्हीस रोडवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. उड्डाणपुल दोन वर्षात पूर्ण करावयाचे असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार जोमाने कामाला लागले आहेत. या मार्गावर उड्डाणपुलाअभावी लाखनी, मुरमाडी शहरातील अनेकांना जीव गमवावा लागला. जखमींची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आता उड्डाणपुलाचे बांधकाम होणार असून राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागणार आहे.एप्रिल महिन्यात गेला पाच जणांचा बळी३० एप्रिलच्या रात्री मालीपार येथील जगनाडे यांच्या मुलीचा विवाह लाखनीत होता. त्यादिवशी महामार्गावरच्या एका मंगल कार्यालयासमोर उभे असलेल्या वऱ्हाड्यांना भरधाव ट्रकने चिरडले होते. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले सात जण आजही त्या जखमा सोसत आहेत. या मार्गावर उड्डाणपुल असता तर त्या निष्पाप जीवांचा बळी गेला नसता. त्यापूर्वी याच मार्गावर अनेक लहानमोठे अपघात घडले आहेत. त्यातही अनेकांचा जीव गेला आहे.पोलीस बंदोबस्तात निर्मूलन मोहीमलाखनीत अतिक्रमण हटविताना कुणीही अडथळा आणू नये, यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच अतिक्रमण धारकांना नोटीस पाठविली होती. तरीसुद्धा अनेकांनी अतिक्रमण हटविले नव्हते. जेव्हा अतिक्रमण काढणारे जेव्हा येथील तेव्हा पाहू, असे म्हणत काहींनी अतिक्रमण कायम ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाला पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढावे लागत आहे.