शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

आता उड्डाणपूल होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:14 IST

लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते.

ठळक मुद्देमहामार्गावरील आठवडी बाजारात बंदोबस्त : लाखनीत अतिक्रमण निर्मूलन मोहीम

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते. आता मुदतीनंतर प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गावरील १०० फुटापर्यंतचे अवैध बांधकाम, पानठेले, लहान दुकाने, दुकानासमोरील टिनाचे शेड हटविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लाखनीत येत्या काही दिवसात उड्डाणपुलाची समस्या मार्गी लागणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अशोका बिल्डकॉम, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व उड्डाणपुलाचे बांधकाम करणारी जेएमसी कंपनी यांच्या संयुक्तवतीने लाखनी शहरातील व्यापाºयांना अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही व्यापाºयांनी आवाहनाला प्रतिसाद देत अतिक्रमण हटविले. परंतु प्रतिसाद न देणाºया व्यापारी व दुकानचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आजपासून आरंभ करण्यात आली आहे. १०० फुटापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू होत असल्यामुळे सर्व्हीस रोडवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. उड्डाणपुल दोन वर्षात पूर्ण करावयाचे असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार जोमाने कामाला लागले आहेत. या मार्गावर उड्डाणपुलाअभावी लाखनी, मुरमाडी शहरातील अनेकांना जीव गमवावा लागला. जखमींची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आता उड्डाणपुलाचे बांधकाम होणार असून राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागणार आहे.एप्रिल महिन्यात गेला पाच जणांचा बळी३० एप्रिलच्या रात्री मालीपार येथील जगनाडे यांच्या मुलीचा विवाह लाखनीत होता. त्यादिवशी महामार्गावरच्या एका मंगल कार्यालयासमोर उभे असलेल्या वऱ्हाड्यांना भरधाव ट्रकने चिरडले होते. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले सात जण आजही त्या जखमा सोसत आहेत. या मार्गावर उड्डाणपुल असता तर त्या निष्पाप जीवांचा बळी गेला नसता. त्यापूर्वी याच मार्गावर अनेक लहानमोठे अपघात घडले आहेत. त्यातही अनेकांचा जीव गेला आहे.पोलीस बंदोबस्तात निर्मूलन मोहीमलाखनीत अतिक्रमण हटविताना कुणीही अडथळा आणू नये, यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच अतिक्रमण धारकांना नोटीस पाठविली होती. तरीसुद्धा अनेकांनी अतिक्रमण हटविले नव्हते. जेव्हा अतिक्रमण काढणारे जेव्हा येथील तेव्हा पाहू, असे म्हणत काहींनी अतिक्रमण कायम ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाला पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढावे लागत आहे.