शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

आता विदर्भ राज्यासाठी लढा

By admin | Updated: January 4, 2015 23:07 IST

स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी

जिल्हानिहाय समिती : पत्रपरिषदेत वामनराव चटप यांची माहितीभंडारा : स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून सिंदखेडराजा येथून विदर्भ गर्जनायात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ जाँर्इंट अ‍ॅक्शन कमिटीचे पदाधिकारी अ‍ॅड.वामनराव चटप यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, तत्पूर्वी २० जानेवारीपासून जिल्हा व तालुका समितीचे गठन करण्यात येईल. विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे. १९५३ ला झालेल्या नागपूर करारात विदर्भाचा विकास करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी २३ कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के निधी, २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के उच्च शिक्षणाच्या सोयी आणि राज्यातील २३ टक्के मंत्री देण्याचा समावेश होता. कृषी, खनिज, वने आदी संपदा मोठ्या प्रमाणात असूनही विदर्भाचा अनुशेष वाढतच राहिला. शेवटी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. तरीही सिंचनाचा अनुशेष कायम आहे. विदर्भाच्या वाट्याचे ६० हजार कोटी रूपये पळविल्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. मागील ११ वर्षात येथील ३४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोजगार नसल्याने तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत. विदर्भाची मागणी केल्यावर दोन मराठी राज्ये नको, विदर्भ राज्य स्वतंत्र झाल्यास सक्षम राहणार नाही, असा तर्क लावला जातो. संयुक्त महाराष्ट्रात राहुनही विदर्भाच्या वाट्याला काहीच मिळत नाही. तेलंगणा राज्यापेक्षा स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जुनी असली तरी तेलंगणा राज्य झाले आहे.वन, खनिज शेती यांच्यावर आधारीत उद्योग नसल्याने येथील उच्चशिक्षित युवक मुंबई, पुण्याकडे धाव घेत आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढत असताना विदर्भाची लोकसंख्या मात्र कमी होत आहे. पत्रपरिषदेला राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक राम नेवले, अनिल तिडके, अरूण केदार ,विष्णू आष्टीकर, दुर्वास धार्मिक, अ‍ॅड. टेंभूर्णीकर, सौरभ दिवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)