शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

आता विदर्भ राज्यासाठी लढा

By admin | Updated: January 4, 2015 23:07 IST

स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी

जिल्हानिहाय समिती : पत्रपरिषदेत वामनराव चटप यांची माहितीभंडारा : स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून सिंदखेडराजा येथून विदर्भ गर्जनायात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ जाँर्इंट अ‍ॅक्शन कमिटीचे पदाधिकारी अ‍ॅड.वामनराव चटप यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, तत्पूर्वी २० जानेवारीपासून जिल्हा व तालुका समितीचे गठन करण्यात येईल. विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे. १९५३ ला झालेल्या नागपूर करारात विदर्भाचा विकास करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी २३ कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के निधी, २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के उच्च शिक्षणाच्या सोयी आणि राज्यातील २३ टक्के मंत्री देण्याचा समावेश होता. कृषी, खनिज, वने आदी संपदा मोठ्या प्रमाणात असूनही विदर्भाचा अनुशेष वाढतच राहिला. शेवटी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. तरीही सिंचनाचा अनुशेष कायम आहे. विदर्भाच्या वाट्याचे ६० हजार कोटी रूपये पळविल्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. मागील ११ वर्षात येथील ३४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोजगार नसल्याने तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत. विदर्भाची मागणी केल्यावर दोन मराठी राज्ये नको, विदर्भ राज्य स्वतंत्र झाल्यास सक्षम राहणार नाही, असा तर्क लावला जातो. संयुक्त महाराष्ट्रात राहुनही विदर्भाच्या वाट्याला काहीच मिळत नाही. तेलंगणा राज्यापेक्षा स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जुनी असली तरी तेलंगणा राज्य झाले आहे.वन, खनिज शेती यांच्यावर आधारीत उद्योग नसल्याने येथील उच्चशिक्षित युवक मुंबई, पुण्याकडे धाव घेत आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढत असताना विदर्भाची लोकसंख्या मात्र कमी होत आहे. पत्रपरिषदेला राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक राम नेवले, अनिल तिडके, अरूण केदार ,विष्णू आष्टीकर, दुर्वास धार्मिक, अ‍ॅड. टेंभूर्णीकर, सौरभ दिवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)