शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आता आषाढातही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : जग कितीही बदलले असले तरीही आजही तारखा पाहूनच लग्नकार्ये केली जातात. आषाढात लग्नकार्य केली जात नसल्याची परंपरा ...

भंडारा : जग कितीही बदलले असले तरीही आजही तारखा पाहूनच लग्नकार्ये केली जातात. आषाढात लग्नकार्य केली जात नसल्याची परंपरा आहे; परंतु सध्या कोरोनामुळे जग बदलले आहे. सध्या अनेक ठिकाणी कोरोनामुळे थांबलेली लग्नकार्ये उरकली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरी भागात दिसून येत आहे. कोरोनापूर्वी आषाढ महिन्यात लग्नकार्य सहसा केले जात नसत. आता या परंपरेला फाटा दिला जात आहे. यासाठी अनेक शास्त्रीय कारणे असली तरी आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा या महिन्यात लग्नकार्य पार पाडले जात नाहीत. भंडारा शहरात अनेक मंगलकार्यालये आहेत यामध्ये तारखा बुकिंग केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनामुळे मंगलकार्यालयापेक्षा अनेक जण दारासमोरच लग्न करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थांबलेली अनेकांचे लग्न होत आहेत. अनेकांनी लग्न, तसेच अन्य कार्यक्रमही कोरोनामुळे थांबविले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने लग्न उरकले जात आहेत.

बॉक्स

मंगलकार्यालय बुक होत आहेत....

दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये लग्नकार्याचे प्रमाण फारच कमी असते. मात्र, कोरोनाने अनेकांचे विवाहसोहळे थांबले असल्याने सध्या मंगलकार्यालयेही काही प्रमाणात बुक होत आहेत. भंडारा शहरासह ग्रामीण भागातील मंगलकार्यालयांमध्ये १६, २२, २९ जुलै या तारखा बुक असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

५० नागरिकांच्या उपस्थितीलाच परवानगी....

जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही लग्नासाठी ५० जणांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली जात आहे. यामुळे ५० जणांची उपस्थिती गृहीत धरूनच लग्नकार्यासाठी बोलावले जाते. मात्र, प्रत्यक्षात याचे पालन करताना मंगलकार्यालय चालकांसह वधू-वर मंडळींना कठीण होत आहे.

बॉक्स

आषाढातही शोधल्या या शुभ तारखा

आषाढ महिन्याला सुरुवात झाली असून, या महिन्यात सहसा लग्नकार्य करण्यात येत नाहीत, असे वडीलधारी मंडळी सांगतात. मात्र, तरीसुद्धा काही जण अनेक पंडितांना विचारून या महिन्यातील १६, २२, २९ या तारखांना बुकिंग करीत आहेत.

कोट

आषाढ महिन्यात फार पूर्वीपासूनच लग्नसोहळे न करण्याची अनेक शास्त्रीय कारणे आहेत. यावर अनेक जण विश्वास ठेवत नसले तरीही आषाढ महिन्यात पावसामुळे रोगराईचे प्रमाण जास्त असते. सर्वत्र शेतीची कामे सुरू असतात. पावसाने विविध संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे लग्न आषाढ महिन्यात न करण्याची पूर्वापर परंपरा आहे. मात्र, आता या युगात कोणी कुणाला सांगावे आणि कुणी ऐकावे, असा प्रश्न आहे.

तानाजी गायधने, महाराज