शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता आषाढातही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : जग कितीही बदलले असले तरीही आजही तारखा पाहूनच लग्नकार्ये केली जातात. आषाढात लग्नकार्य केली जात नसल्याची परंपरा ...

भंडारा : जग कितीही बदलले असले तरीही आजही तारखा पाहूनच लग्नकार्ये केली जातात. आषाढात लग्नकार्य केली जात नसल्याची परंपरा आहे; परंतु सध्या कोरोनामुळे जग बदलले आहे. सध्या अनेक ठिकाणी कोरोनामुळे थांबलेली लग्नकार्ये उरकली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरी भागात दिसून येत आहे. कोरोनापूर्वी आषाढ महिन्यात लग्नकार्य सहसा केले जात नसत. आता या परंपरेला फाटा दिला जात आहे. यासाठी अनेक शास्त्रीय कारणे असली तरी आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा या महिन्यात लग्नकार्य पार पाडले जात नाहीत. भंडारा शहरात अनेक मंगलकार्यालये आहेत यामध्ये तारखा बुकिंग केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनामुळे मंगलकार्यालयापेक्षा अनेक जण दारासमोरच लग्न करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थांबलेली अनेकांचे लग्न होत आहेत. अनेकांनी लग्न, तसेच अन्य कार्यक्रमही कोरोनामुळे थांबविले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने लग्न उरकले जात आहेत.

बॉक्स

मंगलकार्यालय बुक होत आहेत....

दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये लग्नकार्याचे प्रमाण फारच कमी असते. मात्र, कोरोनाने अनेकांचे विवाहसोहळे थांबले असल्याने सध्या मंगलकार्यालयेही काही प्रमाणात बुक होत आहेत. भंडारा शहरासह ग्रामीण भागातील मंगलकार्यालयांमध्ये १६, २२, २९ जुलै या तारखा बुक असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

५० नागरिकांच्या उपस्थितीलाच परवानगी....

जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही लग्नासाठी ५० जणांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली जात आहे. यामुळे ५० जणांची उपस्थिती गृहीत धरूनच लग्नकार्यासाठी बोलावले जाते. मात्र, प्रत्यक्षात याचे पालन करताना मंगलकार्यालय चालकांसह वधू-वर मंडळींना कठीण होत आहे.

बॉक्स

आषाढातही शोधल्या या शुभ तारखा

आषाढ महिन्याला सुरुवात झाली असून, या महिन्यात सहसा लग्नकार्य करण्यात येत नाहीत, असे वडीलधारी मंडळी सांगतात. मात्र, तरीसुद्धा काही जण अनेक पंडितांना विचारून या महिन्यातील १६, २२, २९ या तारखांना बुकिंग करीत आहेत.

कोट

आषाढ महिन्यात फार पूर्वीपासूनच लग्नसोहळे न करण्याची अनेक शास्त्रीय कारणे आहेत. यावर अनेक जण विश्वास ठेवत नसले तरीही आषाढ महिन्यात पावसामुळे रोगराईचे प्रमाण जास्त असते. सर्वत्र शेतीची कामे सुरू असतात. पावसाने विविध संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे लग्न आषाढ महिन्यात न करण्याची पूर्वापर परंपरा आहे. मात्र, आता या युगात कोणी कुणाला सांगावे आणि कुणी ऐकावे, असा प्रश्न आहे.

तानाजी गायधने, महाराज