शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

आता जिल्ह्यात होणार ‘ई-डिस्ट्रिक्ट’ प्रणाली

By admin | Updated: May 6, 2015 00:48 IST

तहसील कार्यालयातून काढण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांदरम्यान नागरिकांना सुविधा मिळावी, यासाठी शासनाने सेतू केंद्रांची निर्मिती..

१८१ महा-ई-सेवा केंद्रांची निवड : सेतू केंद्राचे महा-ई-सेवेत परिवर्तनसंजय मते भंडारातहसील कार्यालयातून काढण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांदरम्यान नागरिकांना सुविधा मिळावी, यासाठी शासनाने सेतू केंद्रांची निर्मिती केली. मात्र, आता त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जात जिल्ह्यातील १८१ महा ई सेवा केंद्रातून कामकाज होणार आहे. यासाठी जिल्हा ई-डिस्ट्रिक्ट प्रणालीने जोडण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.महाराष्ट्र शासनाने सेतू केंद्रातून नागरिकांना आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण करता यावे, यासाठी जिल्ह्यात सेतू केंद्र सुरू केलेत. यातून नागरिकांना जातीचा दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, शेतीसंबंधी सातबारा, शेतकऱ्यांच्या विविध नोंदी, शैक्षणिक दाखले ज्यात नॉन क्रिमिलेयर असे अनेक दाखल देण्यात येतात.जिल्ह्यात १८१ महा-ई-सेवा केंद्र असून त्यांना या ई-डिस्ट्रिक्ट सेवेसंबंधी मोहाडी येथे महा-ई-सेवा केंद्र संचालकांचे प्रशिक्षण पार पडले. यात तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनांनाही प्रशिक्षण देण्यात आले. यापूर्वी केवळ सेतू केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातून नागरिकांना तहसील कार्यालयात जावून लागणारे दाखल काढावे लागते असे. यासाठी त्यांना शारीरिक, मानसीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असे. शासनाने यात सुधारणा करून नागरिकांना त्यांच्याच गावात ही सुविधा मिळावी, यादृष्टिने एक पाऊल पुढे जात जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून ई-डिस्ट्रिक्ट्र सेवा सुरू करण्यात येत आहे. यात नागरिकांना होणार त्रास व अर्जनविसांकडून होणारी लूट थांबणार आहे. सोबतच आवश्यक असलेले प्रमाणपत्र आॅनलाईन मिळणार असल्याने तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील सेतू केंद्र महा-आॅनलाईनने जोडणार असल्याने नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात १ मे पासून या सेवेचा शुभारंभ झाला आहे. भंडारा जिल्ह्यातही या सेवेचा लाभ नागरिकांना लवकरच मिळणार आहे. यादृष्टिने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या योजनेमुळे नागरिकांचा त्यांच्या गावातूनच प्रमाणपत्र मिळणार असल्याने त्यांचा वेळ, पैसा वाचणार असून कामात पारदर्शकता येणार आहे. ई-डिस्ट्रिक्ट प्रणालीने ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्र त्यांच्याच गावात मिळणार आहे. या प्रणालीमुळे कामात पारदर्शकता येणार असून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाही.- आशिष वानखेडेजिल्हा संयोजक, महा-ई-सेवा केंद्र, भंडारा.नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी शासनाने घेतलेला योग्य निर्णय आहे. याची सुरूवात मोहाडी तालुक्यातून करण्याच्या दृष्टिने प्रायोगिक तत्वावर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. योजनेचा शुभारंभ लवकरच होईल.-हरिश्चंद्र मडावी तहसीलदार मोहाडी