शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आता नववी नापासांना दहावीत प्रवेश

By admin | Updated: July 18, 2015 00:35 IST

विद्यार्थी ज्या वर्गात नापास होतो त्याच वर्गात त्याला पुन:प्रवेश घ्यावा लागतो.

अशोक पारधी पवनीविद्यार्थी ज्या वर्गात नापास होतो त्याच वर्गात त्याला पुन:प्रवेश घ्यावा लागतो. ही आतापर्यंतची प्रथा दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने नविन परिपत्रक निर्गमित केल्याने नववी नापास विद्यार्थ्यांना थेट अर्ज भरुन १० वीच्या परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.इयत्ता नववीमध्ये नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सन २०१४-१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विहित अटींची पुर्तता केल्यास फार्म नं. १७ भरुन माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. माध्यमिक शाळेत इयत्ता नववी मध्ये नापास झालेले विद्यार्थी पुन्हा इयत्ता नववी मध्येच दाखल होताच आणि इयत्ता नववी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेवून माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होतात. असे विद्यार्थी इयत्ता नववी मध्ये नापास झाल्याने त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाते. सदचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून सन २०१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर खाजगीरित्या प्रविष्ठ होण्यासाठी अटींचे पालन करीत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शालांत परिक्षांना प्रविष्ठ होता येईल. असा शासन निर्णय झालेला असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी (माध्य.) व शाळा प्रमुखांना अशा ईच्छुक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्याची सुचना केलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे हे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.