शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पोषण आहार वितरणात घोळ

By admin | Updated: July 3, 2014 23:22 IST

स्थानिक समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराची अफरातफर झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही चौकशी करण्यात आली नाही.

लाखनी : स्थानिक समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराची अफरातफर झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकरण दडपण्यात तर येत नाही ना? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेने केला आहे. पोषण आहार वाटपात घोटाळा झालेला आहे. यासाठी नेमके कोण जबाबदार आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दि. १ एप्रिल रोजी पोषण आहाराचा शाळेला पुरवठा करण्यात आलेला आहे. माहिती अधिकारात तक्रारकर्त्यांनी माहिती मागीतल्यानंतर मुख्याध्यापकांनी खोटी माहिती दिली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन शाखा भंडारा यांच्याकडून साहित्य उचलल्याची खरी पावती मिळाली. मुख्याध्यापकांनी दिलेली पावती व जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेली पावती यात उचल केलेल्या साहित्यात तफावत दिसून येत आहे. हरभरा व तुरडाळीची शाळेने उचल केलेली नाही मोहरी, मिरची पावडर, हळद पावडर, आयोडीनयुक्त मिठाची उचल केलेली नाही. जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या पावतीमध्ये सर्व मालाची मोठ्या प्रमाणात उचल केलेली आहे.शाळेत गरीब मुलांना दुपारचे भोजन मिळावे यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना व पोषण आहार योजना सुरु केली आहे. परंतु मुलांच्या आहाराची अफरातफर करीत आहे. रिपब्लिकन सेना आक्रमकसमर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.आर. कोल्हारे यांनी शालेय पोषण आहारात अफरातफर केल्याचा आरोप करुन दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम, तुलशीदास गेडाम, भजनदास मेश्राम, राहुल मेश्राम यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)