शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर स्थानांतरणाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

पाच दशकापूर्वी वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या ईटान गावाचे पुनर्वसन केले गेले. या पुनर्वसनांतर्गत ईटान गावापासून जवळपास २ कि.मी. अंतरावर ईटान-कऱ्हांडला मार्गावर जमीन उपलब्ध करून गावातील जवळपास ३०० कुटुंबांना भूखंड देण्यात आले. पुनर्वसनाअंतर्गत कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील अधिकतर कुटुंबांनी स्थानांतरणाला विरोध केला.

ठळक मुद्देईटान येथील नागरिकांत खळबळ : महसूल प्रशासनाच्या कारवाईची टांगती तलवार

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाद्वारे पुनर्वसन केले जाऊनदेखील स्थानिक नागरिकांद्वारा स्थानांतरण न करण्यात आल्याने दरवर्षी पुराच्या प्रकोपाने स्थानिक ईटान येथील नागरिकांना विविध नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत पुनर्वसित नागरिकांद्वारा स्थानांतरण न केल्या गेल्याने यंदाच्या पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे प्रभावित तथा क्षतिग्रस्त  कुटुंबांना शासनाद्वारे कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याची धमकीपूर्ण नोटीस स्थानिक तलाठ्यामार्फत देण्यात आल्याने स्थानिक ईटान येथील नागरिकांत खळबळ माजली आहे.पाच दशकापूर्वी वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या ईटान गावाचे पुनर्वसन केले गेले. या पुनर्वसनांतर्गत ईटान गावापासून जवळपास २ कि.मी. अंतरावर ईटान-कऱ्हांडला मार्गावर जमीन उपलब्ध करून गावातील जवळपास ३०० कुटुंबांना भूखंड देण्यात आले. पुनर्वसनाअंतर्गत कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील अधिकतर कुटुंबांनी स्थानांतरणाला विरोध केला.गावातीलच काही कुटुंबांनी पुनर्वसनांतर्गत उपलब्ध जमिनीवर स्थानांतरण करून अन्य कुटुंबांना देण्यात आलेल्या प्लॉटवर देखील अतिक्रमण केले असल्याचा आरोप आहे. दरवर्षी गावात वैनगंगा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याने सर्व कुटुंबांच्या घरांसह शेतीचे नुकसान होत असते.  पूरपीडितांना नुकसानभरपाई दिली जाते. यंदा पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीत पीडित कुटुंबांना शासनाद्वारे कुठलीही मदत किंवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याची नोटीस स्थानिक तलाठ्यामार्फत नागरिकांना देण्यात आल्याने खळबळ माजली आहे. ५० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पुनर्वसनांतर्गत स्थानांतरणासाठी स्थानिक तलाठ्यामार्फत नोटीस बजावण्यात आल्याने महसूल प्रशासनाविरोधात नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे.  पावसाळ्याच्या तोंडावर ईटान निवासी नागरिकांना पुनर्वसित जागेवर स्थानांतरणाची नोटीस बजावणाऱ्या तलाठ्याविरोधात  कारवाईची मागणी होत आहे.

 

टॅग्स :floodपूरriverनदी