शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:20 IST

शिक्षणाने सर्वांची प्रगती शक्य आहे. शिक्षणामुळे मानवी जीवनात कमालीचे परिवर्तन झाले आहेत.

विनायक बुरडे यांचे प्रतिपादन : पालोरा शाळेतील स्नेहसंमेलनाचे उद्घाटनकरडी (पालोरा) : शिक्षणाने सर्वांची प्रगती शक्य आहे. शिक्षणामुळे मानवी जीवनात कमालीचे परिवर्तन झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास घ्यावा. जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत. पालोरा शाळेत सर्व भौतिक सुविधांची पूर्तता आहे. येथील विद्यार्थ्यांनी संशोधनाचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी व्हावे. शाळेत शिक्षकांची कमतरता असली तरी त्यावर तोडगा काढला जाईल. शाळेच्या प्रगतीवर गावाची व देशाची प्रगती अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे सदैव लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सभापती विनायक बुरडे यांनी केले.पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय स्नेहसंमेलन, विज्ञान प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहाडी पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे होते. उद्घाटन सभापती विनायक बुरडे यांचे हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी माजी जिल्हा परीषद सदस्य के.बी. चौरागडे, उपसभापती विलास गोबाडे, तहसीलदार धनंजय देशमुख, जिल्हा परीषद सदस्य सदस्या सरिता चौरागडे, निलकंठ कायते, पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे, सरपंच माला मेश्राम, जांभोराचे सरपंच भूपेंद्र पवनकर, केंद्रप्रमुख माथुरकर, अमरकंठ लांडगे, पत्रकार युवराज गोमासे, भोजराम तिजारे, पोलीस पाटील विरेंद्र रंगारी, रामचंद्र मते, भगवान घोनमोडे, योगीता चिंधालोरे, देवनाथ अतकरी, आशिष चिमणे, नानाजी वासनिक, अकलेश कोडापे, योगेश्वर चिंधालोरे, दिनेश मेश्राम, किरण भोयर, हितेश मेश्राम, परसराम काळे, सुनिता हातझाडे, सरिता धांडे, दवळू भोयर, आशालता चिमणे, मालनबाई गजभिये, रवी अतकरी, आरती अतकरी, प्राचार्य सेवकराम शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.पालोरा शाळा तालुक्यातील उत्कृष्ट शाळा आहे. शाळेत मोठ्या प्रमाणात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शाळेचे व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे असल्याने शाळेचे जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात प्रगती केली आहे. पालकांची व शिक्षकांची मार्गदर्शकाची भूमिका नेहमीच लाभत असल्याने ग्रामीण भागातील शाळा असताना कुठेही विद्यार्थी मागे नाहीत. विद्यार्थ्यांच्या खेळांकडे व अभ्यासाकडे नियमित लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांनी यावेळी केले. तहसीलदार देशमुख यावेळी म्हणाले, यशासाठी कठीण परिश्रम मोलाचे असतात. विद्यार्थ्यांनी त्यासाठी झटत राहिले पाहिजे. आजचे काम आताच करण्याला महत्व देण्याची आवश्यकता आहे.प्राचार्य सेवकराम शेंडे यांनी प्रास्ताविकातून शाळेची माहिती दिली. शाळेत चार शिक्षकांच्या जागा रिक्त असून जिल्हा परिषदेने याकडे लक्ष पुरविण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिक्षकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तासिकेवर शिक्षक शाळेत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. उपस्थित पाहुण्यांनी माता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करून लोकांना पाहण्यासाठी प्रदर्शन खुले करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून पाहुण्यांची वाहवा मिळविली. आभार प्रदर्शन के.पी. माने यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक ए.एस. निमजे, यु.आर. हटेवार, शाळा नायक मच्छिंद्र नेवारे, श्वेता धांडे, करण खराबे, व्ही.के. बुरडे, एस.डी.शेंडे, विजयलाक्ष्मी आकरे, शेखर हट्टेवार, एस.एस. टेंभुरकर, संजय वासनिक, प्रकाश भोयर, भोजराम तिजारे व सर्व शिक्षकांनी, पालकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)