शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

परीक्षा नव्हे, जीवन जिंकण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

वरठी : परीक्षा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते. शालेय परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ...

वरठी : परीक्षा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते. शालेय परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा नुसत्या परीक्षा नसून जीवन जिंकण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले.

नवप्रभात हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मुख्याध्यापकाच्या सभेत ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कमल कटारे व मुख्याध्यापिका सुवर्णा पाठक उपस्थित होते. शालेय शिक्षणात इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येतात. शालेयस्तरावर आयोजित या परीक्षांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आले आहे. शालेय जीवनात अशा परीक्षेत सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची खरी ओळख होऊ शकते. शालेय जीवनात या स्पर्धा परीक्षा पर्वणीप्रमाणे असून विद्यार्थ्यांना ध्येय ठरवण्यासाठी कामी पडू शकते, असे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले.

गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी तालुक्यातील मुलांना स्पर्धा परीक्षांची जाणीव निर्माण होऊन त्यात आवड निर्माण करण्यासाठी तालुक्यात हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांनी परीक्षा फीस भरण्यापासून ते मोफत पुस्तके वाटप करण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. यासाठी शाळास्तरावर शिक्षकांनी पुढाकार घेऊन नियमित वर्ग घेण्याबरोबर सराव परीक्षेचीही तयारी केली आहे. जिल्ह्यातील या अभिनव उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षक व पालकांनी यात आपले थोडेसे शैक्षणिक श्रम लावून योजना यशस्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख रविशंकर बिसने यांनी केले तर मुख्याध्यापक श्रीकांत सार्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रकाश वैरागडे, के. जी. साखरे, बी. बी. भिवगडे, किशोर लांजेवार, माधवी नंदनवार आदी उपस्थित होते.