शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा नव्हे, जीवन जिंकण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

वरठी : परीक्षा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते. शालेय परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ...

वरठी : परीक्षा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते. शालेय परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा नुसत्या परीक्षा नसून जीवन जिंकण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले.

नवप्रभात हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मुख्याध्यापकाच्या सभेत ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कमल कटारे व मुख्याध्यापिका सुवर्णा पाठक उपस्थित होते. शालेय शिक्षणात इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येतात. शालेयस्तरावर आयोजित या परीक्षांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आले आहे. शालेय जीवनात अशा परीक्षेत सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची खरी ओळख होऊ शकते. शालेय जीवनात या स्पर्धा परीक्षा पर्वणीप्रमाणे असून विद्यार्थ्यांना ध्येय ठरवण्यासाठी कामी पडू शकते, असे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले.

गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी तालुक्यातील मुलांना स्पर्धा परीक्षांची जाणीव निर्माण होऊन त्यात आवड निर्माण करण्यासाठी तालुक्यात हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांनी परीक्षा फीस भरण्यापासून ते मोफत पुस्तके वाटप करण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. यासाठी शाळास्तरावर शिक्षकांनी पुढाकार घेऊन नियमित वर्ग घेण्याबरोबर सराव परीक्षेचीही तयारी केली आहे. जिल्ह्यातील या अभिनव उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षक व पालकांनी यात आपले थोडेसे शैक्षणिक श्रम लावून योजना यशस्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख रविशंकर बिसने यांनी केले तर मुख्याध्यापक श्रीकांत सार्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रकाश वैरागडे, के. जी. साखरे, बी. बी. भिवगडे, किशोर लांजेवार, माधवी नंदनवार आदी उपस्थित होते.