शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

परीक्षा नव्हे, जीवन जिंकण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

वरठी : परीक्षा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते. शालेय परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ...

वरठी : परीक्षा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते. शालेय परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा नुसत्या परीक्षा नसून जीवन जिंकण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले.

नवप्रभात हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मुख्याध्यापकाच्या सभेत ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कमल कटारे व मुख्याध्यापिका सुवर्णा पाठक उपस्थित होते. शालेय शिक्षणात इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येतात. शालेयस्तरावर आयोजित या परीक्षांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आले आहे. शालेय जीवनात अशा परीक्षेत सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची खरी ओळख होऊ शकते. शालेय जीवनात या स्पर्धा परीक्षा पर्वणीप्रमाणे असून विद्यार्थ्यांना ध्येय ठरवण्यासाठी कामी पडू शकते, असे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले.

गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी तालुक्यातील मुलांना स्पर्धा परीक्षांची जाणीव निर्माण होऊन त्यात आवड निर्माण करण्यासाठी तालुक्यात हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांनी परीक्षा फीस भरण्यापासून ते मोफत पुस्तके वाटप करण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. यासाठी शाळास्तरावर शिक्षकांनी पुढाकार घेऊन नियमित वर्ग घेण्याबरोबर सराव परीक्षेचीही तयारी केली आहे. जिल्ह्यातील या अभिनव उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षक व पालकांनी यात आपले थोडेसे शैक्षणिक श्रम लावून योजना यशस्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख रविशंकर बिसने यांनी केले तर मुख्याध्यापक श्रीकांत सार्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रकाश वैरागडे, के. जी. साखरे, बी. बी. भिवगडे, किशोर लांजेवार, माधवी नंदनवार आदी उपस्थित होते.