शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

मोबाईल बालपणच नव्हे तर दृष्टीही हिरावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ज्येष्ठांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने विविध समस्या ...

ठळक मुद्देसर्वेक्षणातील वास्तव : पालकांनो, मुलांचे डोळे सांभाळा, मोबाईल व टिव्ही पासून दूर ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्येष्ठांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. सर्वाधिक समस्या बालकांमध्ये दिसत असून मोबाईल बालपणच नव्हे तर दृष्टीही हिरावत आहे. भंडारा येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.विशाखा जिभकाटे यांनी २५२ मुलांच्या मोबाईल सवयीचे सर्वेक्षण केले. त्यात अनेक धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.सध्या घरोघरी टिव्ही, मोबाईल, संगणक दैनंदिन कामासाठी वापरल्या जातो. नवीन पिढी तर टेक्नोसॅव्ही झाली आहे. प्रत्येकाच्या घरी किमान दोन तरी स्मार्ट फोन आहेतच. सुरुवातीला कुतूहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता सवयीचा झाला आहे. मात्र त्याच्या गंभीर समस्यांचाही सामना करावा लागत आहे. डॉ.विशाखा जिभकाटे यांच्याकडे येणारे बहुतांश पालक मोबाईलमुळे आपल्या मुलाची दृष्टी कमी झाल्याची तक्रार घेऊन येतात. १०० पालकांमध्ये २५ ते ३० पालक अशी समस्या घेऊन तपासणीसाठी आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. भंडारा शहरातील २५२ पालकांच्या माध्यमातून मुलांच्या मोबाईल सवयीचा अभ्यास केला. एक प्रश्नावली पालकांना देण्यात आली. त्यात मुलं किती वेळ अभ्यास करतात, कितीवेळ टिव्ही बघतात, कितीवेळ मोबाईलवर खेळतात आणि कितीवेळ बाहेर खेळायला जातात असे काही प्रश्न होते. त्यात अनेक धक्कादायक निष्कर्ष पुढे आले. लहान मुलांच्या हातातून मोबाईल काढणे अगदी दिव्य असल्याचे या पालकांनी कबुल केले. बालकांपुढे पालकांचे काहीही चालत नाही.मोबाईलने वाढला चष्म्याचा नंबर-सर्वेक्षणात उच्च, मध्यम आणि कनिष्ठ गटातील पालकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात उच्च-मध्यमवर्गीयांच्या मुलांमध्ये दूरचे दिसत नसल्याच्या अनेक तक्रारी आढळून आल्या. अनेक मुलांना चष्म्याचा नंबर वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील पालकांमध्ये या तक्रारी दिसल्या नाहीत. त्यांच्या मुलांना चष्माही अगदी कमी लागल्याचे दिसून येते.पब्जीचे जडले व्यसनमोबाईलवर पब्जीमुळे अनेक मुले वेडेपिसे झाल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. रात्री झोपेतही मुले दचकून उठतात. दिवसभर मोबाईलमध्ये मान टाकून बसलेले असतात. आपल्या पाच-सहा मित्रांचा ग्रूप तयार करून मोबाईलवर खेळत असतात. पब्जी खेळणाऱ्यांमध्ये दहावीनंतरचे असल्याचे या सर्वेक्षणात पुढे आले.मुलांना वेळ देणे गरजेचेलहान मुलं ही चंचल असतात. त्यांच्या मेंदूला काहीतरी हवे असते. बहुतांश पालक मुलांच्या हाती मोबाईल देऊन आपली सुटका करून घेतात. मात्र त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. पालकांनी मुलांना विविध अ‍ॅक्टीव्हीटीमध्ये गुंतवावे. मैदानी खेळासाठी प्रवृत्त करावे. एवढेच नाही तर पालकांनीही आपल्या मोबाईलच्या सवयी बदलायला हव्या. घरात सारखे मोबाईलवर न राहता मुलांसोबत संवाद साधत त्यांना वेळ देण्याची गरज आहे, असे डॉ.विशाखा जिभकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Mobileमोबाइल