शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

४० वर्षांपासून जमिन मालकी हक्काचे पट्टे मिळेना; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2023 15:42 IST

खुटसावरीतील समता एकता नगरवासी संतप्त

भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील समता एकता नगरवासी गत ४० वर्षापासून जमीन मालकी हक्काचे पट्टे मिळण्याबाबत शासन प्रशानाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना अद्यापर्यत मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नसल्याने समता एकता नगरवासी संतप्त झाले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय खुटसावरी अंतर्गत असलेल्या समता एकतानगरवासी गत ४० ते ४५ वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. सध्या या नगरामध्ये जवळपास ८० कुटुंब जीवन जगत आहेत. याठिकाणी स्वस्त धान्य दुकान, अंगणवाडी केंद्र, हनुमान मंदिर यांच्यासह अनेक कुटुंबाला सरकारच्या शासकीय योजनेतून घरकूल बांधकामदेखील मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजस्व विभागांतर्गत असलेल्या सातबारावर भूमापन क्रमांक व उपविभाग ९७ अंतर्गत एकूण क्षेत्र ५.३२ हेक्टर आर चौरस मीटर आहे. कुळखंड व इतर अधिकारातंर्गत सदर गट निस्तार व चराईकरीता मुकरर म्हणून उल्लेख आहे. या ठिकाणी कोणतेही जंगल नाही. गत ४० वर्षांपासून येथे अनेकांचे पक्के बांधकाम असून एक गावच तयार झालेला आहे. सर्व शासकीय योजना मिळत असताना त्यांना अद्यापर्यत जमीनीचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही.

समता एकता नगर येथील जवळपास १४० मतदार मतदानाचा हक्क बजावतात. मात्र त्यांना निवडणूक रिंगणात उभे होता येत नाही. जर उभे झाल्यास अपात्रतेची टांगती तलवार दाखवून धमकावले जाते. सरकारकडून अनेकदा विविध शासकीय जमिनींवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे आश्वासन दिले जाते. ४० वर्षांपासून मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी३० ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित ग्रामसभेत ठराव घेण्यात आलेला आहे. यासंबधीचे निवेदन खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे. मात्र यावर कोणतीच उपाययोजना न झाल्याने समता एकता नगरवासींयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

समता एकता नगरवासीयांना तातडीने जमिनीचे पट्टे द्यावे, यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. त्याचा प्रशासनाकडे नियमित पाठपुरावा सुरु आहे. राज्य शासनाकडे तसे निवेदन पाठविले आहे. -संदीप खंडाते, सरपंच, खुटसावरी.

समता एकतानगरात गत ४० वर्षापासून अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. मात्र अद्यापही जमीनीचे पट्टे मिळाले नाही. पट्टे मिळावे, यासाठी नेहमीची लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- रवींद्र वासनिक, समता एकता नगरवासी.

सरकारकडून अनेकदा विविध शासकीय जमिनींवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक वर्षांपासून आमचे वास्तव्य असतानाही अद्यापही पट्टे मिळाले नाही. जिल्हाधिकारी महाेदयांनी याकडे लक्ष देऊन जमिनीचे पट्टे मिळविण्यासाठी सहकार्य करावे. -अरुण मांढरे, समता एकता नगरवासी.