शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वाचनालयात ना बसायला जागा, ना वाचायला पुरेशी पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

‘वाचाल तर वाचाल’ या वृक्ती प्रमाणे वाचनालय माणसाला समृध्द करतात. शासकीय अनुदानावर पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वाचनालय उघडण्यात आले आहे. यातील अपवाद वगळता. बहुतांश वाचनालयामध्ये सुविधांचा अभाव आहे. येथे पुस्तके असली तरी येथील नियोजनाअभावी वाचक फिरकतांना दिसत नाही.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : ग्रामीण भागातील वाचनालयांची शोकांतिका

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : वाचन संस्कृती समृध्द करण्यात वाचनालयाचे मोठे योगदान असते. भंडारा जिल्ह्यातही अनेक गावात वाचनालयांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र पवनी तालुक्यातील बहुतांश वाचनालयात ना बसायला जागा आहे ना वाचायला पुरेशी पुस्तके आहेत. केवळ शासकीय अनुदानावर ही वाचनालय कागदोपत्री जीवंत आहेत.‘वाचाल तर वाचाल’ या वृक्ती प्रमाणे वाचनालय माणसाला समृध्द करतात. शासकीय अनुदानावर पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वाचनालय उघडण्यात आले आहे. यातील अपवाद वगळता. बहुतांश वाचनालयामध्ये सुविधांचा अभाव आहे. येथे पुस्तके असली तरी येथील नियोजनाअभावी वाचक फिरकतांना दिसत नाही. पुस्तके कपाटबंद दिसत आहेत.शासकीय अनुदानातून खरेदी केलेल्या पुस्तकांना दुरावस्थेने वाचक मिळत नाही. अनेक तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र त्यांना गावातील वाचनालयात स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळत नाही. अड्याळ येथे एक सोडून दोन वाचनालय आहेत. परंतु येथील वाचनालयात कोणत्याही सुविधा दिसत नाही. काही ठिकाणची वाचनालय तर एकाच खोलीत सुरु आहेत. वर्तमानपत्र आणि पुस्तके तेथे असली तरी बसायला जागाच नाही. विद्यार्थ्यांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु सुविधा मात्र मिळाल्या नाही.ग्रामपंचायतीचे दुर्लक्षकाही वर्षांपुर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी होत नाही असे बोलले जात होते. परंतु आता मोठ्या प्रमाणात ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. शहरात जावून शिकवणी लावणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे गावातील वाचनालयातच अभ्यास करण्याचा त्यांचा कल असतो. परंतु वाचनालयात सुविधा मिळत नाही. या वाचनालयावर ग्रामपंचायतीचे प्रत्यक्ष नियंत्रण नसले तरी सुविधांबाबत ग्रामपंचायत त्यांना सुचना देवू शकते. सुसज्ज वाचनालयासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :libraryवाचनालय