शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक भवन नव्हे समाजविघातक कृत्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

तत्कालिन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर. अंतुले यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. भंडाऱ्यात १९८५-८६ मध्ये भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली. एक कोटी रुपये या भवनासाठी खर्च करण्यात आले होते. या भवनात सुसज्ज सभागृह, व्हरांडा, नाट्यगृह आदी बांधण्यात आले. या सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीनंतर माहिती व जनसंपर्क महासंचनालयातर्फे आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले.

ठळक मुद्देभंडारा येथील प्रकार: भवनाच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जोपासता यावा, त्याला चालना मिळावी व पयार्याने कलावंतांना त्यांच्या हक्काची जागा मिळावी, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने येथील जकातदार शाळा परिसरात भव्य सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी अनेक राज्यस्तरावरील प्रख्यात अभिनेते, कलावंत यांचे कार्यक्रम पार पडले. मात्र, आज कुणीही या भवनाकडे फिरकूनही पाहत नाही. त्यामुळे हे भवन आता समाजविघातक कृत्यांचा अड्डा बनत चालला आहे..तत्कालिन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर. अंतुले यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. भंडाऱ्यात १९८५-८६ मध्ये भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली. एक कोटी रुपये या भवनासाठी खर्च करण्यात आले होते. या भवनात सुसज्ज सभागृह, व्हरांडा, नाट्यगृह आदी बांधण्यात आले. या सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीनंतर माहिती व जनसंपर्क महासंचनालयातर्फे आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले. त्यावेळी या भवनामुळे जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचा पाया रोवला जाईल, असे भाकित वर्तविले गेले होते. परंतु, त्यानंतर या भवनाची जी दुर्दशा होत राहिली, ती अद्यापही सुस्थितीत आली नाही. आणि त्याकडे कुणाचे लक्षही गेले नाही. सांस्कृतिक भवनाचे दरवाजे, पंखे, टाक्या, रेलिंग आदी सामान चोरुन नेण्यात आले. घन मारुन भिंतीना फोडण्यात आले. त्यातील लोखंडाच्या सळाखी विकून अनेकांनी पोट भरले. घन मारल्याचा आवाज रात्रभर यायचा, असे परिसरातील लोक सांगतात. चोरीचे प्रकार आतापर्यंत सुरुच होते. या भवनात आता एकही साहित्य शिल्लक नाही. केवळ विटा व सिमेंटने तयार केलेला सांगाडा तेवढा उभा आहे. भवन परिसरात स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. या भवनाच्या निर्मितीनंतर या भवनाकडे जाणाऱ्यांची गर्दी दिसायची. या भवनाला इतिहास आहे. या ठिकाणी अनेकांनी भेटी दिल्या आहेत. मात्र आज या भवनाचा उपयोग सार्वजनिक शौचालयासाठी होतो. राज्यशासन, जिल्हा प्रशासन यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे सांस्कृतिक भवनाची अशी दशा झाली आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप सामान्य नागरिक व कलावंतांकडून होत आहे. शहराच्या मधोमध प्रशस्त जागेत भवनाची टोलेजंग इमारत बांधूनही त्याचा कोणताही वापर होत नाही, ही यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.सांस्कृतिक भवन नसल्याने जिल्ह्यात होणारे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम भाड्याने घेतलेल्या सभागृहांमध्ये आयोजित केले जातात. येथील कलांवतांनी सांस्कृतिक भवनाच्या पुर्नजिवनासाठी अनेकदा मागणी केली. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला. परंतु, शासनाला जाग आली नाही. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत असले तरी याची अंमलबजावणी करण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिक