शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

ना बसायला जागा, ना डोक्यावर छत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST

११ लोक ०६ के विशाल रणदिवे अड्याळ : भंडारा- पवनी महामार्गावरील अड्याळ येथील प्रवासी निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. ना ...

११ लोक ०६ के

विशाल रणदिवे

अड्याळ : भंडारा- पवनी महामार्गावरील अड्याळ येथील प्रवासी निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. ना बसायला जागा, ना डोक्यावर छत, ना सुविधा. यापूर्वी प्रवाशांना निदान उभ्या असलेल्या झाडाची तथा वर्गणी गोळा करून तयार झालेल्या मंडपाची तरी सावली मिळायची आणि त्यात कसेतरी प्रवासी उभे राहायचे; पण आज तेही उपलब्ध नाही. या ज्वलंत समस्येकडे कुणी लक्ष देणार काय, असा सवाल आहे.

प्रवासी उन्हात उभे राहताहेत याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पुन्हा यासाठी वर्गणी गोळा करून येथील शेड बांधायचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या; पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणी उन्हाचे वाढते तापमान याकरता आता विचार होणे गरजेचे झाले आहे.

अड्याळ बसथांबा परिसरात आधी पक्का प्रवासी निवारा होता. अतिक्रमण हटविण्यात आले तेव्हा तोही पाडण्यात आला. त्यानंतर पक्का प्रवासी निवारा बांधण्यात आला नाही. आज याठिकाणी रोज शेकडोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात; पण सुरक्षितता नाही. प्रवाशांना साधे उभे राहायला, बसायला, छतसुद्धा नाही. मग प्रवाशांनी उन्हात राहायचे कसे, त्यात वृद्ध व बालकांना त्याचा किती त्रास होतो आहे, याची जाणीव तरी कुणाला आहे का? असेही आज बोलले जात आहे.

आधी जे शेड होते, काही सिमेंट खुर्च्या होत्या, त्या गेल्या कुठे, हाही संशोधनाचा विषय आहे. कारण त्या खुर्च्या व शेड हे कुणी लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायत प्रशासनाचे नसून ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून केलेल्या पैशाने ती सर्व व्यवस्था केली होती, हेही सत्य आहे. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना जेव्हा तेथील नालीचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून तेथील शेड व खुर्च्या कुठे गेल्या, कुठे आहेत, याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत चालले आहे, याकडे आताच लक्ष दिले गेले नाही, तर वाढत्या उन्हात याठिकाणी एकही छत नसल्याने एखाद्या वयोवृद्ध इसमाचा तथा बालकाचा व एखाद्या विद्यार्थ्याचासुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच अड्याळ हे गाव चर्चेत राहत असतानासुद्धा याठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी एक साधा प्रवासी निवारा तयार करायला जर ग्रामवासी वर्गणी गोळा करून मदतीचा हात पुढे करतात, तर मग लोकप्रतिनिधी तथा लोकप्रिय नेते व राजकारणी मंडळी अशा वेळी जातात कुठे, असेही आज बोलले जात आहे.

महामार्गाचे बांधकाम सुरू आहे; पण ज्या-ज्याठिकाणी कामे झालीत त्या-त्याठिकाणी दिवसातून कितीदा पाण्याचा शिडकाव होतो. ग्रामवासी तथा प्रवाशांना रोजचा किती त्रास होतो, याची जराशी तरी जाणीव आहे का कुणाला, असाही सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.