शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ना सांत्वना, ना मायेच्या स्पर्शाचा आधार

By admin | Updated: April 5, 2017 00:20 IST

आयुष्यात सारे वादळ वारे अंगावर घेत ते गावातून स्थलांतरित झाले. अडचणी, जगण्याची जिद्द या आयुष्यात गरगर फिरत राहिले.

लोकमत मदतीचा हात : आभाळाच्या छत्रछायेत राहणाऱ्या धनराजला देवदूत गवसणार कां?मोहाडी : आयुष्यात सारे वादळ वारे अंगावर घेत ते गावातून स्थलांतरित झाले. अडचणी, जगण्याची जिद्द या आयुष्यात गरगर फिरत राहिले. जीवनात त्यांच्या नशिबी वेदना, दु:खच आले. जीवनाची वेल खुरटत असताना कुणीतरी सांत्वना देईल. मायेच्या स्पर्शाचा आधार देईल, या आशेने आजही ते बघत आहेत. परंतु मायाच संवेदनाहीन झाल्याने निळे आभाळ मुठीत घेऊन जीवन कंठणारे कुटुंब, हक्काची जागा व घरकूल कधी मिळेल याची आस लावून बसले आहे.गरीबीची जीवघेणी अवहेलना त्याची कास सोडत नाही. दोन घासाच्या अन्नासाठी त्यांना गाव सोडावं लागलं. नातेसंबंधांना पांगून तो मोहाडीत स्थिरावला. पण, आजही ते कुटुंब आशाळभूत नजरेने मायेच्या ओलाव्याची प्रतीक्षा करीत आहे. तब्बल २५ वर्षापासून तो हक्काची जागा व छोटसं घरकुल मिळावं यासाठी अनेकांपुढे हात पसरत आहे. मोहाडीत सुभाष वॉर्ड किंबहूना वाळीत टाकल्यागत गरीबीचे चटके सोसणारा धनराज नगरधने यांच्या परिवाराची हृदय हेलावून टाकणारे हे वास्तव आहे. जगणं संपन्न करण्यासाठी नात्यांचा ओलावा आवश्यक ठरतो. नाते विभक्त करताना क्लेश होतो. पण, नियती अन् परिस्थिती एकोपा तोडायला भाग पाडते. धनराजचेही असेच झाले. मुंढरी खुर्द येथून तो दोन दशकापूर्वी बाहेर पडला. कारण होतं गरीबी. कान्हळगाव (सिर), मोरगाव याठिकाणी त्याने आश्रय शोधला. त्याला रोजगार अन् आधार फारसा मिळाला नाही. धनराज पत्नीसह मोहाडीत स्थिरावला. भाड्याच्या घरात राहून मजूरी करून जीवन पुढे ढकलत होता. या घरातून त्या घरी गरागरा फिरत राहिला. आपण भाड्याने किती दिवस राहू, हा प्रश्न त्याला सतावत असताना हक्काची जागा मिळेल या हेतूने काही वर्षापूर्वी सुभाष वॉर्डात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ झोपडी बांधली. नगरपंचायतीची निवडणुकीत भाडेकरूने (धनराज नगरधने) यांनी बाजूने मतदान केले नाही. या संशयावरून रात्रीच बाहेर काढले. रात्र कुठे काढणार? हा विचार येताच धनराजने संसाराचा पसारा घेत लेकराबाळांना झोपडीत आणले. आता तो त्याच झोपडीत स्थिरावला आहे. झोपडीला गवताचे पांघरुण, काड्या, कुडाच्या भिंती, आत एकच खोली, समोर स्वयंपाकाची जागा असा हा त्याचा निवारा. नदीकाठील मोकळे मैदान, डुकरांची वस्ती, झोपडीशेजारी पाण्याची टाकी, अंधारातील जीणे, वीज नाही, लुकलुकणारी दिव्यांच्या प्रकाशात आनंद मानणारा हा कुटुंब थंडी, वारा, उन्ह, पाऊस पाणी, वादळ सोसत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. विहिरीत श्वास रोखून, बुडी मारून तळचा दगड आणण्याची जिद्द ठेवणारी उर्मिला नावाची लेक शिक्षण घेत आहे. एक मुलगा मॅट्रीकला आहे. आईवडीलांची होणारी दमछाक, वेदना संपविण्यासाठी शिक्षण महत्वाचं असल्याच धनराजची पत्नी सांगत होती. आता आपली एकच आस मुलीनं शिकावे, मोठे व्हावे. फाटक्या झोपडीला हक्काचे स्थान यावे, एक सुंदर घरकूल बनावे अशी आशा आहे. गरीबांचे कुणी नसतात ती जाणीव त्यांना झालीय. नगर पंचायतीला निवेदन दिली. पण आजही त्याचा उपयोग झाला नाही. २ मार्च मोहाडीत नाना पटोले यांचा जनता दरबार भरला. धनराजच्या मुलीने परिवाराची व्यथा मांडत. सर, आम्ही केव्हाही मरू शकतो हे वाक्य खासदारांच्या काळजाला लागले. सगळेच एक वेळ स्तब्ध झाले. खा.पटोलेंनी मदत करण्याचे आश्वासन दिलेनिराधारांना मायेची सावली देण्याची, निस्वार्थ कर्म तेवढंच त्याग असेल तर मायेने आसवे पुसून जाण्याची उर्मी येते. पण इथे तर संवेदनाच मृत झाल्याने दुसऱ्यांच्या वेदना समजून त्यांना मदतीचा हात कोण देणार? धनराजचा चार जणांचा परिवार उपेक्षित जीवन जगत आहे. आता तरी मायेचा स्पर्श करून आधार देणारा कुणीतरी देवदूत गवसणार का? यांची त्यांना प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)