शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनोऱ्यासाठी ना ठरावाची चिंता, ना मानवी जीवाचा मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवी जीवाला कवडीमोल किंमत उरली, असे दिसू लागले आहे. हे साकोली येथील प्रभाग क्रमांक ...

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवी जीवाला कवडीमोल किंमत उरली, असे दिसू लागले आहे. हे साकोली येथील प्रभाग क्रमांक सातमधील तलाव वाॅर्डात भरवस्तीत उभारलेल्या मोबाईल मनोऱ्याच्या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. लोकांची संमती नसतानाही किंबहुना नगरपरिषदेत कुठलाही ठराव नसताना मोबाईल मनोरा उभारण्यात आला. त्यामुळे कुणीही कुठेही ‘मनी पॉवरने’ मोबाईल मनोरा बांधकामाची सहजरित्या परवानगी घेऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

कोरोना काळात दुसऱ्या लाटेअंतर्गत अनेकांचा जीव गेला. मानवी जीवाचे मोल काय असते, हे सांगायची गरज राहिली नाही. मात्र, आता मनुष्य मनुष्याच्या जीवाची फिकीर करीत नाही, असे जाणवत आहे. तलाव वॉर्डातील निर्माणाधीन मोबाईल मनोरा बांधकाम प्रकरणातही असेच घडले आहे. मानवी जीविताची किंमत कवडीमोल समजून भरवस्तीत मोबाईल मनोरा उभारण्यात आला आहे. मनोरा कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा फटका मानवी जीवनावर किती घातक ठरतो, हे सांगण्याची गरज नाही. असे असतानाही अधिकारी व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनाही याची किंमत नसावी, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावात ही परवानगी दिली, हे एक न समजणारे कोडे आहे.

भ्रष्टाचाराच्या गर्तेत फसलेली प्रशासन यंत्रणा कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वाॅर्डवासीयांच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता मनोरा बांधकामाला परवानगी दिलीच कशी जाते? हा प्रश्न अनुत्तरीत असताना याचे गांभीर्य पालिका मुख्याधिकाऱ्यांना कळले कसे नाही? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. किंबहुना विद्यमान मुख्याधिकारीही या गंभीर समस्येकडे कानाडोळा करीत असतील तर दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही वाॅर्डवासीयांना पडला आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी लक्ष देणार काय?

साकोली शहरातील तलाव वाॅर्डात निर्माणाधीन मोबाईल मनोरा बांधकामात कुठलाही ठराव नगरपालिकेत घेण्यात आला नाही. वाॅर्डवासीयांनी एकदा सोडून दोनदा निवेदन दिले. त्यात मनोरा बांधकामामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हे बांधकाम अन्यत्र करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी केली आहे. मुख्याधिकारीही आश्वासन देऊन मोकळे झाले आहेत. मात्र, त्यांनी कुठलीच प्रशासनिक कारवाई केली नाही. पालिकेचे पदाधिकारी ही गप्प बसले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.