शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

मनोऱ्यासाठी ना ठरावाची चिंता, ना मानवी जीवाचा मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवी जीवाला कवडीमोल किंमत उरली, असे दिसू लागले आहे. हे साकोली येथील प्रभाग क्रमांक ...

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवी जीवाला कवडीमोल किंमत उरली, असे दिसू लागले आहे. हे साकोली येथील प्रभाग क्रमांक सातमधील तलाव वाॅर्डात भरवस्तीत उभारलेल्या मोबाईल मनोऱ्याच्या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. लोकांची संमती नसतानाही किंबहुना नगरपरिषदेत कुठलाही ठराव नसताना मोबाईल मनोरा उभारण्यात आला. त्यामुळे कुणीही कुठेही ‘मनी पॉवरने’ मोबाईल मनोरा बांधकामाची सहजरित्या परवानगी घेऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

कोरोना काळात दुसऱ्या लाटेअंतर्गत अनेकांचा जीव गेला. मानवी जीवाचे मोल काय असते, हे सांगायची गरज राहिली नाही. मात्र, आता मनुष्य मनुष्याच्या जीवाची फिकीर करीत नाही, असे जाणवत आहे. तलाव वॉर्डातील निर्माणाधीन मोबाईल मनोरा बांधकाम प्रकरणातही असेच घडले आहे. मानवी जीविताची किंमत कवडीमोल समजून भरवस्तीत मोबाईल मनोरा उभारण्यात आला आहे. मनोरा कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा फटका मानवी जीवनावर किती घातक ठरतो, हे सांगण्याची गरज नाही. असे असतानाही अधिकारी व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनाही याची किंमत नसावी, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावात ही परवानगी दिली, हे एक न समजणारे कोडे आहे.

भ्रष्टाचाराच्या गर्तेत फसलेली प्रशासन यंत्रणा कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वाॅर्डवासीयांच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता मनोरा बांधकामाला परवानगी दिलीच कशी जाते? हा प्रश्न अनुत्तरीत असताना याचे गांभीर्य पालिका मुख्याधिकाऱ्यांना कळले कसे नाही? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. किंबहुना विद्यमान मुख्याधिकारीही या गंभीर समस्येकडे कानाडोळा करीत असतील तर दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही वाॅर्डवासीयांना पडला आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी लक्ष देणार काय?

साकोली शहरातील तलाव वाॅर्डात निर्माणाधीन मोबाईल मनोरा बांधकामात कुठलाही ठराव नगरपालिकेत घेण्यात आला नाही. वाॅर्डवासीयांनी एकदा सोडून दोनदा निवेदन दिले. त्यात मनोरा बांधकामामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हे बांधकाम अन्यत्र करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी केली आहे. मुख्याधिकारीही आश्वासन देऊन मोकळे झाले आहेत. मात्र, त्यांनी कुठलीच प्रशासनिक कारवाई केली नाही. पालिकेचे पदाधिकारी ही गप्प बसले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.