शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

ना बस, ना सायकल... सावित्रीच्या लेकीच्या नशिबी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST

मोहाडी : बसचा पास मिळत नाही, अन मानव विकास योजनेतून सायकलही मिळत नाही. सावित्रीच्या लेकींना संघर्ष ...

मोहाडी : बसचा पास मिळत नाही, अन मानव विकास योजनेतून सायकलही मिळत नाही. सावित्रीच्या लेकींना संघर्ष करत शाळेत येण्यासाठी दररोज पायपीट करावी लागत आहे. अतिमागास तालुक्यातील आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनमार्फत राबविली जाते. गरजू मुलींना सायकल वाटपचे मिशन गत वर्षीपासून थांबविण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून कोविड-१९ या विषाणूचे सावट आहे. त्यामुळे शाळा प्रभावित झाल्या. मागील वर्षी काही महिने शाळा सुरू झाल्या होत्या. आता ग्रामीण भागातल्या शाळा १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. परंतु, शाळेत येण्यासाठी सार्वजनिक साधनांचा वापर करण्यास शासनाने मनाई केली आहे. पालकांनी मुलांना शाळेत सोडून द्यावे, अशा सूचना आहेत. त्यामुळे शाळेत येण्यासाठी गाव ते शाळा या दरम्यान सर्व मुलींना मोफत प्रवासासाठी एसटी बसची सोय उपलब्ध नाही. अहिल्याबाई होळकर या योजनेतून मुलींसाठी मोफत पासही दिला जात नाही. त्यामुळे दुर्गम भागातून व अन्य ठिकाणांहून शाळेत येण्यासाठी अनेक मुलींना संघर्ष करावा लागत आहे. पायपीट करत शाळा गाठावी लागत असल्याने मुलींची दमछाक होत आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. दुर्गम भागातून पावसाळ्यात दूरवरून मुली शाळेत येताना असुरक्षित असल्याची भीती व्यक्त करीत आहेत. मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे शाळा गळतीचे प्रमाण रोखणे, हा उद्देश मानव विकास योजनेचा आहे. पण, मुलींना शाळेत येण्यासाठी सध्या साधन उपलब्ध करून दिले नसल्याने अनेक मुली शाळा सुरू होऊनही शाळेत येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

मानव विकास योजनेतून मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी तीन हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते. तथापि, मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव मानव विकास योजनेवर झाला. अनुसूचित जातीच्या १७० मुलींना अनुसूचित उपयोजना या योजनेतून सायकलसाठी निधी देण्यात आला. इतर प्रवर्गातील मुलींना सायकल खरेदीसाठी निधी दिला गेला नाही. त्यामुळे मागील वर्षीपासून वंचित असणाऱ्या सावित्रीच्या लेकी शाळेत पायी येत आहेत. यावर्षी तरी मुलींना सायकल खरेदी करण्यास शासन निधी उपलब्ध करून देणार आहे का, असा प्रश्न मुलींचे पालक विचारात आहेत.

कोट

कोविडमुळे मोजक्याच योजनेसाठी निधी प्राप्त झाला होता. तो सर्व निधी वाटप करण्यात आला आहे. मागील वर्षभर शाळा सुरू नसल्याने नियमित योजना शासनाने राबविली नाही. जूनमध्ये शासनाकडून मार्गदर्शक सूचना येतात. पण अजूनपर्यंत कसल्याही सूचना आल्या नाहीत.

- वसुंधरा फाळके

सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, भंडारा

कोट

मानव योजनेच्या बस सुरूबाबत सूचना आल्या नाहीत. अहिल्याबाई होळकर या योजनेंतर्गत मुलींना शाळेत येण्यासाठी बस पास देणे सुरू आहे.

युधिष्ठीर रामचौरे

व्यवस्थापक, एसटी आगार, तुमसर

बॉक्स

कोविडच्या प्रभावामुळे शासनाने अनेक योजनांच्या खर्चावर कात्री लावली आहे. यात शिक्षणविषयक योजनेतील मुलींना शाळेत येण्यासाठी सायकल निधीचा समावेश आहे. यावर्षीसुध्दा जिल्हाधिकारी कार्यालयाला शासन स्तरावर कोणत्याच सूचना आल्या नाहीत. त्यामुळे यावर्षीही मुली सायकल योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता दिसत आहे.

290721\img_20210729_121311.jpg

ना बस, ना सायकल..'ती' च्या नशिबी पायपीट

शाळेत येण्यासाठी संघर्ष: गळतीची भीती