शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

निर्मलग्राम, तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST

गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली त्याच गावात हाणामाऱ्या होत असून निर्मल ग्राम झालेल्या

भंडारा : गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली त्याच गावात हाणामाऱ्या होत असून निर्मल ग्राम झालेल्या गावातच चोरटी दारु विक्री केली जात आहे. त्यामुळे पुरस्काराचे महत्व सवर्सामान्यापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र दिसून येते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध अभियानाच्या माध्यमातून शासन ग्रामीण भागातील गावागावात शांतता, स्वच्छता व व्यसनाधिनता दूर करण्याचा प्रयत्न दिसून येते. तंटामुक्तीचा पुरस्कार असो किंवा निर्मलग्रामचा पुरस्कार असो, गावांना प्राप्त झाल्यानंतर गावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्या समस्यांकडे लक्ष दिलेले दिसून येत नाही. कोणत्याही समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न केल्या जाते. मात्र ज्यावेळी कोणतीही योजना किंवा अभियान गावपातळीवर राबविण्यात येते त्यावेळी त्या योजनेकडे व अभियानाकडे पाहण्याचा हेतू बदलतो. अभियानात सहभागी व्हायचं आणि पुरस्कार मिळवायचा, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जाते. अधिकारी गावात येणाच्या दिवशी गावात स्वच्छता करून अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी गावकरी जमा होतात. संपूर्ण गावाला नववधू सारखे सजविले जाते. मात्र ती खरी वास्तविकता नसते. लाखो रुपयांचे पुरस्कार मिळवायचे आणि मग पुन्हा येरे माज़्या मागल्या. अशी अवस्था अनुभवायास मिळते. पुरस्काराचे पावित्र्य जपण्यासाठी ज्या गावाना निर्मलग्रामचे असो किंवा तंटामुक्तीचे पुरस्कार मिळाले आहे. त्या गावात केरकचरा जमा होऊ नये, गावात तंटे निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्नरत राहीले पाहिजे. मात्र याच्या उलट परिस्थिती दिसते. निर्मलग्राम झालेल्या गावात कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे दिसतात. तर तंटामुक्त झालेल्या गावात तंटे त्याच बरोबर दारुबंदी झालेल्या गावात पुन्हा चोरटी दारु विक्री आदी प्रकार दिसून येत आहेत. काही मुठभर लोकांमुळे अनेक गावाना मिळालेल्या पुरस्काराला कलंक लागला आहे. (शहर प्रतिनिधी)