शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

निर्मलग्राम योजना केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:30 IST

शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घाणच घाण

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे. मात्र ही योजना सध्या कागदावरच दिसून येत आहे. अनेक गावात अद्यापही घाणच घाण पसरलेले असून याकडे मात्र जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.राज्य शासनाने दरवर्षी स्वच्छता अभियान राबविले जाते. त्यामध्ये सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना पुरस्कार प्रदान केला जात आहे. या योजनाची गावात सक्षम आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. मात्र प्रशासनातील अधिकाºयांच्या उदासीन धोरणामुळे या निर्मलग्राम योजनेला खिळ बसली आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, चिकणा, चिचाळ, कोदामेडी अशा अनेक गावात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक नाल्यांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी कचºयांचे ढिगारे तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर शेतखताचे खातकुडे तयार केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असते. मात्र अद्यापही जबाबदार अधिकाºयांनी याकडे लक्ष घातलेले नाही. याबाबत नागरिकांकडून संताप व्याप्त आहे.