शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:50 IST

मागील तीन दिवसांपासून रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह अशा स्थितीमुळे भंडारावासीय त्रस्त झाले आहेत. रविवारच्या रात्री बरसलेल्या पावसानंतर दिवसभर उन्ह चांगलेच तापत आहे. आता उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. परिणामी, घामाच्या धारांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच ओलेचिंब होत आहेत. परंतु आज मंगळवारला पाऊस बरसला नाही.

ठळक मुद्देवादळी वाऱ्याचाही फटका : उकाड्याने नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीन दिवसांपासून रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह अशा स्थितीमुळे भंडारावासीय त्रस्त झाले आहेत. रविवारच्या रात्री बरसलेल्या पावसानंतर दिवसभर उन्ह चांगलेच तापत आहे. आता उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. परिणामी, घामाच्या धारांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच ओलेचिंब होत आहेत. परंतु आज मंगळवारला पाऊस बरसला नाही.भंडारा जिल्ह्यात २ जूनपासून वातावरणात बदल झालेला आहे. दुसरीकडे राज्याच्या पश्चिमी भागात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात मान्सूनपूर्व पावसाला प्रारंभ झाला आहे. मात्र या पावसासोबतच वादळी वाऱ्यानेही चांगलेच थैमान घातले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाची हजेरी लागली आहे. तद्वतच वादळी वाऱ्याने अनेक घरांसह काही वृक्षही उन्मळून पडले आहेत. एकंदरीत वादळी वाऱ्यामुळे कितींचे नुकसान झाले याची नेमकी माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकली नाही.एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस रात्रीला बरसत असल्यामुळे दिवसा सूर्यदेवाचे दर्शन चांगलेच तापदायक ठरत आहे.परिणामी वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला. परिणामी, लोकांची मोठी होरपळ होत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावार होत आहे. या अशा वातावरणामुळे संसर्गजन्य आजार बळावत आहेत. आता ताप, सर्दी, पडसे या आजाराच्या रूग्णसंख्या वाढत आहे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.आरोग्यावर विपरित परिणामऊन्ह पावसाच्या या खेळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. उकाड्यामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम होत असून सर्दी, पडसे, अंगदुखीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयासह खाजगी रूग्णालयातही गर्दी वाढली आहे.बदलत्या वातावरणाचा फटका बालकांना व वृद्धांना अधिक बसतो. अशा स्थितीत वेळीच प्राथमिक उपचार करणे गरजेचे आहे. संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे.- डॉ.यशवंत लांजेवार,बालरोगतज्ज्ञ भंडारा.