शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:50 IST

मागील तीन दिवसांपासून रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह अशा स्थितीमुळे भंडारावासीय त्रस्त झाले आहेत. रविवारच्या रात्री बरसलेल्या पावसानंतर दिवसभर उन्ह चांगलेच तापत आहे. आता उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. परिणामी, घामाच्या धारांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच ओलेचिंब होत आहेत. परंतु आज मंगळवारला पाऊस बरसला नाही.

ठळक मुद्देवादळी वाऱ्याचाही फटका : उकाड्याने नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीन दिवसांपासून रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह अशा स्थितीमुळे भंडारावासीय त्रस्त झाले आहेत. रविवारच्या रात्री बरसलेल्या पावसानंतर दिवसभर उन्ह चांगलेच तापत आहे. आता उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. परिणामी, घामाच्या धारांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच ओलेचिंब होत आहेत. परंतु आज मंगळवारला पाऊस बरसला नाही.भंडारा जिल्ह्यात २ जूनपासून वातावरणात बदल झालेला आहे. दुसरीकडे राज्याच्या पश्चिमी भागात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात मान्सूनपूर्व पावसाला प्रारंभ झाला आहे. मात्र या पावसासोबतच वादळी वाऱ्यानेही चांगलेच थैमान घातले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाची हजेरी लागली आहे. तद्वतच वादळी वाऱ्याने अनेक घरांसह काही वृक्षही उन्मळून पडले आहेत. एकंदरीत वादळी वाऱ्यामुळे कितींचे नुकसान झाले याची नेमकी माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकली नाही.एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस रात्रीला बरसत असल्यामुळे दिवसा सूर्यदेवाचे दर्शन चांगलेच तापदायक ठरत आहे.परिणामी वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला. परिणामी, लोकांची मोठी होरपळ होत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावार होत आहे. या अशा वातावरणामुळे संसर्गजन्य आजार बळावत आहेत. आता ताप, सर्दी, पडसे या आजाराच्या रूग्णसंख्या वाढत आहे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.आरोग्यावर विपरित परिणामऊन्ह पावसाच्या या खेळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. उकाड्यामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम होत असून सर्दी, पडसे, अंगदुखीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयासह खाजगी रूग्णालयातही गर्दी वाढली आहे.बदलत्या वातावरणाचा फटका बालकांना व वृद्धांना अधिक बसतो. अशा स्थितीत वेळीच प्राथमिक उपचार करणे गरजेचे आहे. संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे.- डॉ.यशवंत लांजेवार,बालरोगतज्ज्ञ भंडारा.