शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीतही आले नवीन चेहरे, काेराेना महामारीने वाढविली जिल्हा पाेलिसांची डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गत सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने अनेकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे रोजगार बुडाले. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : गत सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने अनेकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे रोजगार बुडाले. याच काळात गुन्हेगारीचा आलेख थोडाफार कमी झाला. वर्षभराच्या आकडेवारीवर नजर घातल्यास गुन्हेगारीत नवीन चेहरेही दाखल झाल्याचे लक्षात येते. यावर जिल्हा पोलीस प्रशासन सजगपणे कार्य करीत असले तरी यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांची मात्र प्रचंड डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चढ-उतार असा आहे. २०२० मध्ये एकूण तीन हजार ३९७ गुन्ह्यांची, तर २०१९ मध्ये एकूण ३५८० गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, विश्वासघात, गैर कायद्याची मंडळी जमविणे, अपघाती मृत्यू, जुगार, तसेच प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात काही प्रकरणात नवीन चेहरे आले आहेत. यात नवीन शोध लावण्यात पोलीस प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागली. दरोडा, चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांचा कसब लागतो.

गुन्हेगारीत शिरताहेत नवीन चेहरे

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारीचा ग्राफ कमी आहे. कोरोनाकाळात गुन्हेगारीत नवे चेहरे आले आहेत. त्यांचा रेकॉर्ड व तपशील ठेवण्यात पोलिसांना मेहनतही करावी लागत असते, तसेच गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याने पोलीस प्रशासनाची चिंताही बळावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती संकलित केली जात असते.

कुठेही घटना घडल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येत असते. नागरिकही सजग झाले असून याबाबत माहिती देत असतात. पोलिसांना सहकार्य करण्यामागची भूमिका वाढल्यानेच तपासाची ही गती वाढत आहेत. पोलीस दल अधिक कर्तव्यदक्ष बनविण्यावर आम्ही भर देत आहोत.

- वसंत जाधव,

जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

कोरोना महामारीने अनेकांची मन:स्थिती बिघडविली. अनेकांचे रोजगार, उद्योगधंदे बुडाले. त्याचाही मानसिक आघात अनेकांना बसल्याचे जाणवते. अशावेळी त्यांना समुपदेशनासह आर्थिक व सामाजिक मदतीची नितांत गरज असते. त्यावर खऱ्या अर्थाने अशांना मदत झाली पाहिजे.

-डॉ. रत्नाकर बांडेबुचे,

मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा.

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

जिल्ह्यातील क्राईम आलेख बघता पोलिसांना खबऱ्यांची मोठी मदत होत असते. मात्र, आता खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार, असे सूतोवाच पोलीस प्रशासनापुढे आहे. त्यामुळे यंत्रणा प्रभावी होऊ शकेल.