शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

गुन्हेगारीतही आले नवीन चेहरे, काेराेना महामारीने वाढविली जिल्हा पाेलिसांची डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गत सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने अनेकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे रोजगार बुडाले. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : गत सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने अनेकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे रोजगार बुडाले. याच काळात गुन्हेगारीचा आलेख थोडाफार कमी झाला. वर्षभराच्या आकडेवारीवर नजर घातल्यास गुन्हेगारीत नवीन चेहरेही दाखल झाल्याचे लक्षात येते. यावर जिल्हा पोलीस प्रशासन सजगपणे कार्य करीत असले तरी यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांची मात्र प्रचंड डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चढ-उतार असा आहे. २०२० मध्ये एकूण तीन हजार ३९७ गुन्ह्यांची, तर २०१९ मध्ये एकूण ३५८० गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, विश्वासघात, गैर कायद्याची मंडळी जमविणे, अपघाती मृत्यू, जुगार, तसेच प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात काही प्रकरणात नवीन चेहरे आले आहेत. यात नवीन शोध लावण्यात पोलीस प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागली. दरोडा, चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांचा कसब लागतो.

गुन्हेगारीत शिरताहेत नवीन चेहरे

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारीचा ग्राफ कमी आहे. कोरोनाकाळात गुन्हेगारीत नवे चेहरे आले आहेत. त्यांचा रेकॉर्ड व तपशील ठेवण्यात पोलिसांना मेहनतही करावी लागत असते, तसेच गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याने पोलीस प्रशासनाची चिंताही बळावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती संकलित केली जात असते.

कुठेही घटना घडल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येत असते. नागरिकही सजग झाले असून याबाबत माहिती देत असतात. पोलिसांना सहकार्य करण्यामागची भूमिका वाढल्यानेच तपासाची ही गती वाढत आहेत. पोलीस दल अधिक कर्तव्यदक्ष बनविण्यावर आम्ही भर देत आहोत.

- वसंत जाधव,

जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

कोरोना महामारीने अनेकांची मन:स्थिती बिघडविली. अनेकांचे रोजगार, उद्योगधंदे बुडाले. त्याचाही मानसिक आघात अनेकांना बसल्याचे जाणवते. अशावेळी त्यांना समुपदेशनासह आर्थिक व सामाजिक मदतीची नितांत गरज असते. त्यावर खऱ्या अर्थाने अशांना मदत झाली पाहिजे.

-डॉ. रत्नाकर बांडेबुचे,

मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा.

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

जिल्ह्यातील क्राईम आलेख बघता पोलिसांना खबऱ्यांची मोठी मदत होत असते. मात्र, आता खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार, असे सूतोवाच पोलीस प्रशासनापुढे आहे. त्यामुळे यंत्रणा प्रभावी होऊ शकेल.