शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नूतन कन्याची ऋतूजा वाघाये अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत.

ठळक मुद्देदहावीचा निकाल ९४.४१ टक्के : १८ हजार ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण, लाखनीची कीर्ती वाघाये आणि पवनीची आयुषी संयुक्त द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या दहावीच्या निकालात भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतूजा जागेश्वर वाघाये ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४.४१ टक्के लागला असून १७ हजार ५६० विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात ७३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत. लाखनी येथील समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती किशोर वाघाये आणि पवनीच्या वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिनी आयुषी सुनील घावडे या दोघी ९८.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून आल्या आहेत. त्यांना बेस्ट आॅफ फाईव्हमध्ये ४९१ गुण मिळाले आहेत. तर तुमसर येथील शारदा विद्यालयाचा विद्यार्थी लौकीक योगेश पडोळे हा ९७.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय आला आहे.जिल्ह्यातून १७ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी परीक्षासाठी फार्म भरले होते. त्यापैकी १७ हजार ५६० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत चार हजार ६१८, प्रथम श्रेणीत सात हजार ५७, द्वितीय श्रेणीत चार हजार ३८ आणि उत्तीर्ण श्रेणीत ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भंडारा जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ८ हजार ५३१ मुली आणि ९ हजार २९ मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार २३४ मुली म्हणजे ९६.५२ टक्के तर ८ हजार ३३४ मुले म्हणजे ९२.४१ टक्के उत्तीर्ण झालेत.लाखनी तालुका जिल्ह्यात प्रथमदहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी लाखनी तालुक्यातून उत्तीर्ण झालेत. या तालुक्यातून १७७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०५ आहे. लाखांदूर तालुका जिल्ह्यात द्वितीय स्थानी आला असून या तालुक्यातून १७४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.५९ आहे. भंडारा तालुक्यातून ३९५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७५३ म्हणजे ९४.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साकोली तालुक्यातून २४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२७२ म्हणजे ९४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मोहाडी तालुक्यातून २०२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८९४ म्हणजे ९३.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तुमसर तालुक्यातून ३२७८ विद्यार्थ्यांपैकी ३०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५९ टक्के आहे. तर पवनी तालुक्याचा जिल्ह्यात सर्वात कमी ९२.८१ टक्के निकाल लागला.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल