शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
4
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
5
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
6
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
7
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
8
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
9
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
10
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
11
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
12
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
13
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
14
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
15
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
16
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
17
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
18
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
19
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
20
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार

नूतन कन्याची ऋतूजा वाघाये अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत.

ठळक मुद्देदहावीचा निकाल ९४.४१ टक्के : १८ हजार ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण, लाखनीची कीर्ती वाघाये आणि पवनीची आयुषी संयुक्त द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या दहावीच्या निकालात भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतूजा जागेश्वर वाघाये ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४.४१ टक्के लागला असून १७ हजार ५६० विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात ७३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत. लाखनी येथील समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती किशोर वाघाये आणि पवनीच्या वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिनी आयुषी सुनील घावडे या दोघी ९८.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून आल्या आहेत. त्यांना बेस्ट आॅफ फाईव्हमध्ये ४९१ गुण मिळाले आहेत. तर तुमसर येथील शारदा विद्यालयाचा विद्यार्थी लौकीक योगेश पडोळे हा ९७.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय आला आहे.जिल्ह्यातून १७ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी परीक्षासाठी फार्म भरले होते. त्यापैकी १७ हजार ५६० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत चार हजार ६१८, प्रथम श्रेणीत सात हजार ५७, द्वितीय श्रेणीत चार हजार ३८ आणि उत्तीर्ण श्रेणीत ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भंडारा जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ८ हजार ५३१ मुली आणि ९ हजार २९ मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार २३४ मुली म्हणजे ९६.५२ टक्के तर ८ हजार ३३४ मुले म्हणजे ९२.४१ टक्के उत्तीर्ण झालेत.लाखनी तालुका जिल्ह्यात प्रथमदहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी लाखनी तालुक्यातून उत्तीर्ण झालेत. या तालुक्यातून १७७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०५ आहे. लाखांदूर तालुका जिल्ह्यात द्वितीय स्थानी आला असून या तालुक्यातून १७४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.५९ आहे. भंडारा तालुक्यातून ३९५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७५३ म्हणजे ९४.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साकोली तालुक्यातून २४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२७२ म्हणजे ९४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मोहाडी तालुक्यातून २०२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८९४ म्हणजे ९३.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तुमसर तालुक्यातून ३२७८ विद्यार्थ्यांपैकी ३०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५९ टक्के आहे. तर पवनी तालुक्याचा जिल्ह्यात सर्वात कमी ९२.८१ टक्के निकाल लागला.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल