शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

नेरला उपसा सिंचन प्रकल्पावर धडकले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:43 IST

नेरला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील चाळीस गावातील जवळपास सहा हजार हेक्टर शेतजमीनीला फायदा होतो. मात्र यासाठी जमीन संपादीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही त्यांच्या हक्काची सुविधा मिळालेली नाही.

ठळक मुद्देआजी-माजी आमदारांची मोर्चाला भेट : तोडगा निघता निघेना

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : नेरला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील चाळीस गावातील जवळपास सहा हजार हेक्टर शेतजमीनीला फायदा होतो. मात्र यासाठी जमीन संपादीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही त्यांच्या हक्काची सुविधा मिळालेली नाही. पुनर्वसन आधी करावे नंतरच पाण्याची साठवणूक करावी, अशी मुख्य मागणी करीत दोन दिवसांनी परत एकदा नेरला वासीयांनी उपसा सिंचन प्रकल्पावर धडक मोर्चा नेला.दोन दिवसाआधी नेरला ग्रामस्थांनी उपसा सिंचन प्रकल्पाला कुलूप ठोकले होते. त्यामुळे पंपगृह बंद आणि येथील सुरु असलेले कामकाजही बंद पडले होते. यात सहायक अभियंता अमोल वैद्य यांनी कुलूप तोडले, अशी माहिती ग्रामस्थांना मिळाली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा या प्रकल्पावर धडक मोर्चा काढला. आमदार रामचंद्र अवसरे यांना याविषयी काहीच माहिती नसल्याचे शेकडो ग्रामस्थांसमोर मान्य केले. तसेच गावहितासंबधात दोन शब्द बोलून आल्यापावली परतले. त्यानंतर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले. यावेळी कार्यकारी अभियंता मेंढे, तहसीलदार सिध्दार्थ मेंढे, हेमंत कांबळे, एम. डी. वराडे, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रभाकर तिक्कस, सुरेश ढोबळे, हरिदास पाल, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.