शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

नेरला उपसा सिंचनाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:12 IST

नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० टक्के शेतजमीन सन २००० ला अधिग्रहीत करण्यात आली. परंतु अद्याप पुनर्वसन झालेले नाही परिणामी संतप्त झालेल्या नेरला ग्रामस्थांनी चक्क उपसा सिंचनाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देग्रामस्थांनी उचलला आक्रमक पवित्रा : पुनर्वसन आधी करा-मगच धरणात पाणी भरा

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० टक्के शेतजमीन सन २००० ला अधिग्रहीत करण्यात आली. परंतु अद्याप पुनर्वसन झालेले नाही परिणामी संतप्त झालेल्या नेरला ग्रामस्थांनी चक्क उपसा सिंचनाला कुलूप ठोकले.नेरला उपसा सिंचनाला कुलूप ठोकण्याची माहिती वाºयासारखी परिसरात पसरताच हजारो शेतकºयांचे ठोके वाढले यात चुक शासनाची की नेतला ग्रामस्थांची? मागील काळात जेव्हा नेरला उपसा सिंचनाचे कामकाज संथगतीने होत होते. परंतु एकाच वेळेस निवडणूक जवळ येताच काम एवढ्या गतीने सुरु झाले की रात्रंदिवस काम चालले. निमित्त होते नेरला उपसा सिंचनाच्या उद्घाटनाचे. गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला असून नेरला ग्रामस्थांची अंदाजे २०० ते ३०० एकर शेतजमीन पाण्याखाली आली.त्यामुळे लावलेले प्ीके गेलीच. परंतु पाणी गावाजवळ आल्याने मोठ्या प्रमाणात सरपटणाºया प्राण्यांचा हैदोस वाढला. त्यामुळे सुद्धा ग्रामस्थ चिंताजनक स्थितीत आहेत. नेरला ग्रामस्थांच्या मते गावठाणाचे अधिग्रहण करताना जाहीरनाम्याच्या दिवशी ग्रामपंचायत अभिलेखात नमूद असलेल्या एकुण १२३८ कुटुंबाचे रितसर पुनर्वसन करण्यात यावे, नेरला उपसा सिंचन करिता ज्यांच्या जमीनी गेल्या अशांना पॅकेज अंतर्गत पर्यायी जमीन व पुनर्वसन अनुदान द्यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन नेरला ग्रामस्थांनी दिले होते.नेरला ग्रामस्थांनी या आधी आपल्या समस्या कित्येकदा शासनदरबारी मांडल्या. नागपूर, मुंबई, दिल्लीपर्यंत मोर्चात गेले प्रश्न मांडले. अनेक मोठमोठ्या संबंधित विभाग अधिकार तथा लोकप्रतिनिधीकडे पण उपयोग काहीच झाला नसल्याची शोकांतिका यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे आता पर्याय राहिला नसल्याचेही शब्दात व्यक्त केले.लोकप्रतिनिधींना या नेरला गावाविषयीचे प्रश्न माहित नाही का? शासन तथा जिल्हा प्रशासन मग यांनाही माहित नाही का? नेरला ग्रामस्थांनी जे प्राप्त माहितीनुसार अड्याळ व परिसरातील शेतकरी याच नेरला उपसा सिंचनाच्या भरोश्यावर आहेत.परंतु नेरला उपसा सिंचन बंद केल्याच्या माहितीमुळे हजारो शेतकºयांमध्ये धडकी भरली आहे. शेतीला पाण्याची गरज आहे. त्यात एका पाण्याने शेतपीक जावू शकते. त्यामुळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी व विभाग नेरला ग्रामवासीयांच्या कोणत्या मागण्या पूर्ण करतो याकडे हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.हा सर्व प्रकार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे होत आहे. गोसीखुर्द प्रकल्पात बाधीत झालेल्या शेतकऱ्यांचा विचार तात्काळ व्हायला पाहिजे.-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार.नेरला उपसा सिंचनाच्या उद्घाटन वेळीच ग्रामस्थांनी अटकाव, मोर्चा काढला असता परंतु त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन उद्घाटन केले होते.-अनिल कोदाणे, सरपंच नेरला.नेरला या गावाचा जेएमआर करून तात्काळ पुनर्वसन तथा नवीन गावठाण देण्यात यावा.-संजय तळेकर, नेरला.गावाचे सर्वेक्षण झाले त्यांची शेतजमीन गेली आहे. गावठाणबाधीत होत नसल्यामुळे स्वच्छा पुनर्वसन होणार. त्यासाठी कार्यकारी यंत्रणा पॅकेज सुद्धा देणार असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळाली.-अभिमन्यू गोधवड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, भंडारा.