शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पवनीचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:18 IST

विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता असलेल्या पवनी नगरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाहणी केली.

ठळक मुद्देना लोकप्रतिनिधींचे लक्ष ना सरकारचे : अन्यथा हा वारसा ठरणार छायाचित्रापुरता

अशोक पारधी ।आॅनलाईन लोकमतपवनी : विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता असलेल्या पवनी नगरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाहणी केली. पर्यटन विकास निधीतून ढासळत असलेल्या घाटांचे पुनरूज्जीवन करण्याचा संकल्प केला. मात्र जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्याने पुनरजीवनाचा संकल्प हवेतच विरला आहे.पवनी नगर व परिसर पर्यटन स्थळांनी समृध्द आहे. महत्वाकांक्षी असलेल्या गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड- पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचा महत्त्वपूर्ण भाग, सिंदपुरी रूयाळ येथील आंतरराष्ट्रीय महासमाधीभूमी परिसर, अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, स्वयंभू धरणीधर गणेश, रांझीचा महाकाय गणपती, वैजेश्वर मंदिर, जगन्नाथ स्तुप, चंडिकापूर स्तुप, ऐतिहासिक परकोट व जवाहरगेट आणि दैनावस्था झालेला दिवाणघाट व नगरातील मंदिर असा व्यापक पसारा असलेला पर्यटन स्थळांचा महत्त्वपूर्ण गाव आहे. पंरतु पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा मात्र येथे नाहीत. कोणत्याच लोकप्रतिनिधींना पर्यटन विकासाची ईच्छशक्ती नसल्यामुळे दिवाण घाटासारखा ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.भारतीय पुरातत्व विभागाने जवाहर गेट व परकोट याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्या स्थळांची देखभाल दुरूस्ती होत आहे. वैजेश्वर घाटाला महत्त्व दिल्याने लोकप्रतिनिधी व पर्यटन विकास निधीमधून काही प्रमाणात विकास झालेला दिसतो. पंरतु दिवाणघाट, पानखिडकी हे घाट अद्यापही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास, नगर पालिका प्रशासन यापैकी कोणीतरी नामशेष होत असलेल्या या घाटांच्या पुनरुज्जीवनासाठी जबाबदारी घ्यावी, पर्यटनाला चालना देऊन पवनी शहराचा विकास करण्याचा संकल्प केला तरच पर्यटनाच्या नकाशावर पवनीचे नाव कोरल्या जाईल. अन्यथा आठवणी तेवढ्या छायाचित्रापुरते शिल्लक राहतील, यात शंका नाही.