शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रलंबित मागण्यांमुळे शिक्षकांची नकारात्मक मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:52 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत शिक्षकांनी अनेकदा मोर्चे काढले, आंदोलन केले, चर्चा केल्या.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाºयांना निवेदन : अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून आश्वासनाचे गाजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत शिक्षकांनी अनेकदा मोर्चे काढले, आंदोलन केले, चर्चा केल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या शिष्टमंडळाला आतापर्यंत केवळ आश्वासन दिले. मात्र, समस्या सोडविल्या नाही. त्यामुळे भावी पिढी घडविणाºया शिक्षकांची मानसिकता आता नकारात्मक होत असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात आज शिक्षणाधिकारी मोहन चोले यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या त्वरित सोडवाव्या अशी मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या कार्यामुळे गुणवत्ता विकासाचे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात भंडारा जिल्ह्याने मोठी प्रगती केली आहे. ही सर्व प्रगती जिल्ह्यातील शिक्षकांच्या सहकार्याने झालेली असतानाही त्यांच्या समस्यांकडे मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मागील अनेक वर्षांपासून या सर्व प्रलंबित समस्या निकाली निघाव्या यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. संघाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करीत त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी जि. प. प्रशासनापुढे मागण्या मांडल्या. वेळप्रसंगीा खासदार, आमदार व जिल्हा परिषद पदाधिकारी यांनाही निवेदन दिले. मात्र, शिष्टमंडळाला केवळ आश्वासनाचे गाजर देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे आता शिक्षकांची मानसिकता नकारात्मक बनत चालली असल्याचे भितीदायक चित्र दिसून येत आहे. शिक्षणाधिकारी मोहन चोले व अधीक्षक विनोद सोमकुवर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी राधेश्याम आमकर, सुधीर वाघमारे यांची उपस्थिती होती.या मागण्यांसाठी लढा सुरूपदावनत केलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे कार्यशाळेतून केलेले आदेश जारी करावे, वरिष्ठ, निवड श्रेणी प्रकरण त्वरित निकाली काढण्यासाठी मुल्यमापन समितीची तात्काळ मंजुरी प्रदान करावी, आंतरजिल्हा बदलीने शाळेत रूजू झालेल्या शिक्षकांमुळे आधिच्या शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात येवू नये, साकोली तालुक्यातील २०१६ मध्ये केलेल्या बदल्या सार्वत्रिक बदल्यांमधील प्रशासकीय बदलीच्या ३० शिक्षकांचे थकित वेतन आॅनलाईन काढावे, शालेय पोषण आहार नविन धोरणानुसार शाळास्तरावर मुख्याध्यापकांना स्व:खर्चाने करावयाचे आहे. मात्र, पुर्वानुभव बघता याचा मार्ग जिल्हास्तरावर काढावा, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढ थकबाकीसह द्यावी.