शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

लाखांदूर तालुक्याला साठवण बंधाऱ्यांची गरज

By admin | Updated: May 3, 2016 00:42 IST

पावसाचे पाणी न अडता सरळ नदीतून वाहून जाते. तर नाल्यावर लाखो रुपये खर्चून बांधलेले सिमेंट नाला बांधकाम पाणी अडविण्यास असमर्थ ठरत आहेत.

प्रशासन लक्ष देणार का? : शिव मंदिर परिसरात पूल-कम बंधाऱ्याचे नियोजन!लाखांदूर : पावसाचे पाणी न अडता सरळ नदीतून वाहून जाते. तर नाल्यावर लाखो रुपये खर्चून बांधलेले सिमेंट नाला बांधकाम पाणी अडविण्यास असमर्थ ठरत आहेत. गरज आहे चुलबंद नदीवर पूल कम बंधाऱ्याची. मागिल अनेक वर्षाची ही मागणी पूर्ण झाल्यास तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. हेही तितकेच खरे आहे.उन्हाळा आला की शासन स्तरावर पाणी टंचाईच्या बोंबा मारत पंचायत समितीचे कर्मचारी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करतात. त्यासाठी दरवर्षी लागणारा खर्च, एकुणच तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रशासनाचा प्रकार ग्रामपंचायत सचिव, सरपंचाकडून दिसून येतो. तालुक्यात जवळपास ६३ ग्रापंचायती व ७९ गावे आहेत. माहिती नुसार आतापर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीना पिण्याच्या पाण्याच्या सुविधेकरिता नळयोजनेच्या माध्यमातून लाखोचा निधी प्राप्त झाला, खर्चही झाला. पाण्याचा स्रोत शोधून काढ्ण्यासाठी जिल्हा परिषदेचा स्वतंत्र विभाग असताना एकदम उन्हाळा लागताच नळयोजना बंद पडतातच कशा, म्हणजेच कागदी घोडे नाचवुन पाण्याचा स्रोत शोधतात का असा प्रश्न नक्कीच उपस्थीत होतो. पावसाचे पाणी अडविण्यासाठी ग्रामपंचायत किवा प्रशासनाकडुन कोणताच प्रयत्न केला जात नाही. मात्र बंधारे बांधण्यासाठी कोट्यवधीच्या निधिची उधळपट्टी केली जाते. तालुक्याला वैनगंगा व चुलबंद नदीचे वरदान आहे. तालुक्याच्या मधून ह्या दोन्ही नद्या वाहत असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या नद्याच्या उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन केला गेला नाही. उलट धर्मापुरी, चिचोली, आसोला, सोनी येथील नदीपात्रात वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात लाखो रुपये खर्च करुन रपटे बांधले जातात. हा अनावश्यक खर्च टाळून एकदाच चुलबंद व वैनगंगा नदीवर पुल कम बंधाऱ्याचे बांधकाम केल्यास मोठ्या प्रमाणात पाणी अडेल, आपोआपच पाण्याची पातळी वाढेल, पाणी टंचाईच प्रश्न निर्माण होणार नाही.चुलबंद नदीवर बोथली, चिचोली, लाखांदूर शिवमंदिर व सोनी, तर वैनगंगा नदीवर मोहरणा, आवळी येथे पुल कम बंधारे गरजेचे आहेत, परंतु अद्याप याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. लाखांदूर येथील शिव मंदिर परिसरात पुल कम बंधारा बांधकाम करण्यासाठी नगरपंचायतीने ठराव घेऊन शासनाकडे पाठवल्याची माहिती हाती आली आहे. दोन्ही नदीवर पूल कम बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यास पाणी टंचाईवर नक्कीच आळा बसेल. (तालुका प्रतिनीधी)