शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

गोसीखुर्द प्रकल्पासाठी सात हजार कोटींची गरज

By admin | Updated: December 27, 2014 22:44 IST

राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला मागील दोन वर्षात केंद्र सरकारतर्फे छदामही मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आता

धरणाला प्राधान्य : नाना पटोले यांची पत्रपरिषदेत माहिती भंडारा : राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला मागील दोन वर्षात केंद्र सरकारतर्फे छदामही मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा सात हजार कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्यास पाच वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पाचे काम मागील २५ वर्षांपासून सुरु आहे. या कालावधीत प्रकल्पाची किंमत ३२७ कोटी रुपयाहून १४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील मार्च महिण्यात नविन प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. प्रकल्पाच्या बांधकामासाठी आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी पुन्हा सात हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालेल्या प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी काही दिवसांपूर्वी केंद्राच्या चमूने केली होती. त्यांनी या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल केंद्र शासनाला दिला. त्यामुळे केंद्र सरकारने मागील दोन वर्षांपासून प्रकल्पाला एकही निधी दिला नाही. यापूर्वीच्या केंद्र सरकारने १,९०० कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले होते. तथापि, प्रकल्पाच्या बांधकाम निधीची कमतरता असल्यामुळे बांधकाम रखडण्याची शक्यता होती. त्यामुळे लोकसभेत हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांची भेट घेऊन चर्चा केली. यात देशात गोसीखुर्द सारखे नऊ राष्ट्रीय प्रकल्प आहे. ज्यातील अनेक प्रकल्पाचे कामदेखील सुरु झालेले नाहीत. ना.उमा भारती यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला लवकरच निधी देण्यात येईल, असे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पबाधितांच्या समस्या लक्षात घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. यावेळी आपण पुर्नवसनावर भर दिला. नविन पुर्नवसन धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देणे. पुनर्वसनग्रस्तांना राज्य शासनाच्या १८ नागरी सुविधा असताना केंद्र शासनाने २३ नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. गर्रा बघेडा विकास आणूखासदार दत्तक ग्राम योजनेत घेतलेले तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील पन्नास टक्के नागरीक दारीद््रय रेषेखाली आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ या गावाला मिळणार आहे. याशिवाय माईल परिसरातील आठ ते दहा गावे दत्तक घेणार असून त्याठिकाणी माईलचा सीएसआरचा निधी खर्च करणार आहे. पत्रपरिषदेला आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत ईलमे, आरीफ पटेल, संजय मते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)