शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गोसीखुर्द प्रकल्पासाठी सात हजार कोटींची गरज

By admin | Updated: December 27, 2014 22:44 IST

राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला मागील दोन वर्षात केंद्र सरकारतर्फे छदामही मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आता

धरणाला प्राधान्य : नाना पटोले यांची पत्रपरिषदेत माहिती भंडारा : राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला मागील दोन वर्षात केंद्र सरकारतर्फे छदामही मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा सात हजार कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्यास पाच वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पाचे काम मागील २५ वर्षांपासून सुरु आहे. या कालावधीत प्रकल्पाची किंमत ३२७ कोटी रुपयाहून १४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील मार्च महिण्यात नविन प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. प्रकल्पाच्या बांधकामासाठी आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी पुन्हा सात हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालेल्या प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी काही दिवसांपूर्वी केंद्राच्या चमूने केली होती. त्यांनी या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल केंद्र शासनाला दिला. त्यामुळे केंद्र सरकारने मागील दोन वर्षांपासून प्रकल्पाला एकही निधी दिला नाही. यापूर्वीच्या केंद्र सरकारने १,९०० कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले होते. तथापि, प्रकल्पाच्या बांधकाम निधीची कमतरता असल्यामुळे बांधकाम रखडण्याची शक्यता होती. त्यामुळे लोकसभेत हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांची भेट घेऊन चर्चा केली. यात देशात गोसीखुर्द सारखे नऊ राष्ट्रीय प्रकल्प आहे. ज्यातील अनेक प्रकल्पाचे कामदेखील सुरु झालेले नाहीत. ना.उमा भारती यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला लवकरच निधी देण्यात येईल, असे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पबाधितांच्या समस्या लक्षात घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. यावेळी आपण पुर्नवसनावर भर दिला. नविन पुर्नवसन धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देणे. पुनर्वसनग्रस्तांना राज्य शासनाच्या १८ नागरी सुविधा असताना केंद्र शासनाने २३ नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. गर्रा बघेडा विकास आणूखासदार दत्तक ग्राम योजनेत घेतलेले तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील पन्नास टक्के नागरीक दारीद््रय रेषेखाली आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ या गावाला मिळणार आहे. याशिवाय माईल परिसरातील आठ ते दहा गावे दत्तक घेणार असून त्याठिकाणी माईलचा सीएसआरचा निधी खर्च करणार आहे. पत्रपरिषदेला आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत ईलमे, आरीफ पटेल, संजय मते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)