शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विकासासाठी सत्ता परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:56 IST

देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : तुमसरात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.जनसंघर्ष यात्रेच्या तुमसर शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर माजी प्रदेश अध्यक्ष, माणिकराव ठाकरे, आमदार, नसीम खान प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे अनंतराव घरड, माजी आमदार सेवक वाघाये, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अमरनाथ रगडे, रमेश पारधी, शंकर राऊत, नगरसेवक, राजेश ठाकूर, कलाम शेख, प्रभू मोहतुरे, शुभम गभने, आशिष पात्रे, सुनील गिरेपुंजे, शैलेश पडोळे, प्रफुल्ल बिसणे, देवेंद्र मेश्राम, आकाश काकडे, अमित लांजेवार, हरिराम निमकर, गिताताई बोकडे, प्रदीप वाडीभस्मे, राजन सिंगनजुडे, वीणा झंझाड, नैनश्री येळणे, सीमा बडवाईक, वषार्ताई बारई, स्मिता बोरकर, हसन रिझवी, आनंद बिसने, कान्हा बावनकर, नीरज गौर, सुरेश मेश्राम, आकाश बोंद्रे, महेश ढेंगे, युवा नेते पंकज कारेमोरे, आकाश काकडे, सहादेव तुरकर, अजय खंगार, बालकदास ठवकर संजय पिकलमुंडे, चैन मसरके व सरपंच आदी उपस्थित होते.अशोक चव्हाण भाजपच्या नीती वर सडकून टीका करताना म्हणाले की, शेतकरी हवालदिल झाला असताना शेतपिकाला अजूनपर्यंत योग्य हमीभाव मिळाला नाही, कर्जमाफी झाली नाही, तीन राज्यात आमची सरकार येताच कर्जमाफी व २५०० रूपये हमीभाव देण्यात आला आहे. त्यामुळे आता फसवी सरकारला घरचा रास्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरनाथ रगडे यांनी केले.