शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

सामाजिक न्यायाची संकल्पना रुजविणाऱ्या साहित्याची गरज

By admin | Updated: December 21, 2014 22:53 IST

डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची संकल्पना मनुष्य जातीला दिली. त्यांचे विचार आणि कार्य समाजात रुजविण्याची गरज आहे. प्रत्येकाकडून सामाजिक व्यवस्थेचा विचार होणे गरजेचे आहे,

भंडारा : डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची संकल्पना मनुष्य जातीला दिली. त्यांचे विचार आणि कार्य समाजात रुजविण्याची गरज आहे. प्रत्येकाकडून सामाजिक व्यवस्थेचा विचार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी केले.अकरावे आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्यावतीने आयोजित सम्यक संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.रणजित मेश्राम होते. अतिथी म्हणून भदंत सदानंद महाथेरा, आंबेडकरी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, प्रा.सतेश्वर मोरे, उपजिल्हाधिकारी जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड उपस्थित होते. यावेळी डॉ.कळसे म्हणाले, भारतीय राज्यघटनेशिवाय उत्तम साहित्य कुठेही नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक घटकाचा सांगोपांग विचार करुन घटना लिहीली आहे. या राज्य घटनेमुळेच आज महिलांना सर्वतोपरी अधिकार मिळाले आहेत. मानवी आयुष्य जगताना संविधानाची प्रस्तावना प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. यावेळी डॉ.कळसे व प्रा.रणजित मेश्राम यांच्या हस्ते ‘सम्मादिट्टी’ या संमेलन स्मरणिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त भदंत सदानंद महाथेरा यांचा चिवर, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र सत्कार करण्यात आला. यासोबतच आंबेडकरी साहित्य संमेलनात हिरीरीने सहभाग घेतलेले डॉ.मधुकर रंगारी, डॉ.संजय वाने,आसित बागडे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भदंत सदानंद महाथेरा म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांवर मी जगत आहे. माझ्या भिक्षु जीवनाला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. बाबासाहेबांचे विचार अमर्याद आहे. त्यांनी आपल्या देशाला दिलेले संविधानापेक्षा दुसरा राष्ट्रीय ग्रंथ नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचे अनुकरण करा आणि त्याचे पालनही करा, असे आवाहन केले.प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक अमृत बन्सोड यांनी केले. कार्यक्रमासाठी महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, डी. एफ. कोचे, प्रा.अनिल नितनवरे, डॉ.मधुकर धारगावे, प्रा. अनमोल देशपांडे, महादेव मेश्राम, रुपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, एम.डब्ल्यू दीहवले, सुमंत रहाटे, सी.एम.बागडे, करण रामटेके, आदीनाथ नागदेवे, वामन मेश्राम, गुलशन गजभिये, आसित बागडे, गौतम कावळे, के.एल.देशपांडे, संजय बन्सोड, मनिष वासनिक, प्रविण कांबळे, अरुण अंबांदे, माणिक रामटेके, यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)